शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

गडचिरोलीतील वैरागड किल्ल्याचे भाग्य उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:06 IST

१५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचा पुढाकारकुशल कामगारांचा अभाव असल्याने सौंदर्यीकरणास विलंब

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  १५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे.१५ व्या शतकात चंद्रपूरचा गोंडराजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला. पूर्वी वैरागडला हिऱ्याची खाण होती. हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ राजा बल्हाळशहाने हा किल्ला बांधला. हिऱ्याच्या खाणीची लूट करण्यासाठी मुस्लीम राज्याच्या स्वाऱ्या होत असत. पुढे हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले आणि पुढे बल्हाळशहाने आपल्या उत्तरार्ध सैन्य काढून घेतले. तेव्हापासून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पुरातत्त्व विभागाकडून येथील भंडारेश्वर मंदिराचे बऱ्याचपैकी सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तेव्हापासूनच किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले पण कामाला अपेक्षित वेग नव्हता.मागील ३-४ वर्षात किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम चालू आहे. बुरूज तर अद्यापही आहे त्याच अवस्थेत आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्राप्त होणारा निधी तोकडा आहे, असे कंत्राटदार शिंदे सांगतात. कामाचा आवाका मोठा असताना सौंदर्यीकरणाच्या कामावर असणाऱ्या मजुरांची संख्या कमी असून या शिल्पकलेत पारंगत असलेल्या कुशल कामगारांचा अभाव आहे. त्यामुळे किल्ल्याच्या दुरूस्तीच्या कामाला विलंब होत आहे.

गोरजाई मंदिराचा विकास करावैरागडच्या पूर्वेला नागवंशीय आदीम माना जमातीचा धर्मशील, पराक्रमी राजा कुरूम प्रहोद आणि वैरागड येथील गोरजाईचे मंदिर बांधले. सध्या हे मंदिर भग्नावस्थेत आहे. माना समाज बांधवांचे कूलदैवत असलेल्या या मंदिराची पुरातत्त्व विभागाने दुरूस्ती करावी, अनेक दिवसांपासून मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समाजामध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Fortगड