शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

नदीतून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 3, 2014 00:05 IST

जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा

प्राणहिता नदीघाट : प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणीअहेरी : जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे हा प्रवास अत्यंत जीवघेणा होत आहे. प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली नदीघाटावरुन दररोज शेकडो प्रवाश्यांची ने-आण होत आहे. प्रत्येकी ४०-५० रुपये घेतल्या जाते. मात्र प्रवास करताना सुरक्षेची कोणतीच हमी राहत नाही. महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या गुडेम येथील ठेकेदारांनी १५ ते २० हजार रुपये भरुन वाहतुकीचा ठेका घेतला आहे. मात्र सर्व नियम व अटी धाब्यावर बसविले आहे. सध्या प्राणहिता नदी दुथडी भरुन वाहत आहे. अचानक कोणता अपघात घडल्यास जीवितहानी होऊ शकते. कधी-कधी नावाडी मद्यप्राशनसुद्धा करुन डोंगा चालवित असतात. सुरक्षेबाबत लाईफ जॅकेटसाठी नावाड्यास विचारले असता लाईफजॅकेट आम्हाला माहित नाही. शिवाय कधी बघितले नाही, असे उत्तर मिळाले. मागीलवर्षी आंध्रप्रदेशची डीझेल मशीनची नाव नदीच्या मधोमध येऊन बंद पडली होती. तेव्हा खुप मोठा अपघात होण्यापासून वाचला होता. मात्र त्यातून नावाड्यांनी कोणतीच शिकवण घेतली नाही. प्रवाश्यांसोबत दुचाकीचीसुद्धा वाहतुक होते. त्यामुळे आणखीच समस्या उद्भवु शकते. मागील अनेक वर्षांपासून वांगेपली नदीघाटावर पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र या संबंधी लोकप्रतिनीधींनी दिलेले आश्वासन पूर्णपने हवेत वीरले आहे. या नदीवर पूल बनल्यास काजगनगर, मंचेरियाल, चेन्नुर सारख्या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होऊ शकते व पैशांची, वेळेची बचत होऊ शकते. नदीला सध्या पूर आला असून अशीच विनासुरक्षा वाहतुक सुरु राहिल्यास काही अनुचित प्रकार घडु शकतो व जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने कडक नियम तयार करुन याबाबत नावाड्यांना सूचना दिल्या पाहिजे, अन्यथा भविष्यात अपघात व जीवितहानी अटळ आहे. (प्रतिनिधी)