शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रेल्वे पुलातून जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:09 IST

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला.

ठळक मुद्देदेसाईगंजातील प्रकार : अवजड वाहनांच्या केबिनवर बसतात मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला. संपूर्ण ट्रकमध्ये गिट्टी भरली असतानाच केबिनच्यावर मजुरांना बसवून जीवघेणा प्रवास करण्यात आला.देसाईगंज येथील रेल्वेभुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच ओव्हर हेड ब्रेकर लावलेले आहेत. या ब्रेकरची उंची जमिनीच्या ब्रेकरपासून साडेतीन मीटर उंचीवर आहे. बुधवारी डांबरमिश्रीत बारीक गिट्टी भरलेला ट्रक या ठिकाणावरुन जात असताना वर बसलेल्या मजुरांना पूर्णपणे कॅबीनमध्ये झोपावे लागले. अनावधानाने जर चालकाची जराशी चूक झाली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. विशेष म्हणजे, भूयारी पुलाची निर्मिती अवजड वाहनांच्या आवागमनासाठी झालेली नसून पादचारी, दुचाकी, चारचाकी व लहान गाड्यांसाठी आहे. परंतु येथून अवजड वाहने सर्रास चालविली जात आहेत. परिणामी इतरही वाहतूक प्रभावित होत आहे. काही तांत्रिक कारणाने वाहन मागे आल्यास मोठा अनर्थही घडू शकतो.यापूर्वी अवजड वाहन टाकण्यात आल्याने एक-दोन ठिकाणी या मार्गाची तोडफोड झाली आहे. अवजड वाहने जाण्यासाठी बायपास मार्गाची सोय असूनसुद्धा अवजड वाहन चालक शॉर्टकटच्या नादात दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. संबंधित विभागाने या भुयारी पुलाखालून कोणती वाहने जाणार याचा स्पष्ट निर्देश असलेले सुचना फलक फाटकाच्या दोन्ही बाजूला लावावे.या सूचनांचे पालन न करणाºया वाहनावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.