शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

वनहक्कासाठी उपोषण

By admin | Updated: November 1, 2014 01:03 IST

एटापल्ली तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी बांधवांना अनेक दिवसांपासून वनहक्क प्रदान करण्यात आले नाही. तालुक्यातील वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी बांधवांना अनेक दिवसांपासून वनहक्क प्रदान करण्यात आले नाही. तालुक्यातील वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना वनहक्क दावे त्वरित प्रदान करण्यात यावे, अशी मागणी मोर्चे व निवेदनातून प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु तालुक्यातील समाज बांधवांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एटापल्ली येथे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण जनहितवादी युवा समितीच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले आहे. २०१० पासून वनहक्क व इतर विकासात्मक मागण्यांकरिता आदिवासी, गैरआदिवासी समाजाने पुढाकार घेतला आहे. ६ जून व १८ नोव्हेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर गृहसचिव, जिल्हाधिकारी, खासदार, आमदारांना जनहितवादी युवा समितीच्यावतीने एटापल्ली तालुक्यातील समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. आलापल्लीतही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदिवासी व गैरआदिवासींच्या वनहक्क दाव्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अल्पावधीतच प्रशासनाला नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला, असा आरोप जनहितवादी युवा समितीच्यावतीने करण्यात आला आहे.एटापल्ली तालुक्यातील गट्टा मंडळासह उपविभागातील गावांचे सामूहिक वनदावे त्वरित निकाली काढणे, वैयक्तिक वनहक्क दाव्यांवर प्रक्रिया करून वंचितांना लाभ देण्यात यावा, २००८ पासून प्रलंबित असलेल्या व जीपीएसने मोजणी झालेल्या वैयक्तिक सामूहिक दाव्यांवर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून दावे उपविभागीयस्तरावर पाठविण्यासंबंधी तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, वनरक्षक यांना कठोर निर्देश देण्यात यावे, वननिवासी, गैरआदिवासी व अन्याय होऊ नये म्हणून राज्यपालांनी ९ जून रोजी काढलेली अधिसूचना नोकरी संबंधीच्या अध्यादेशात सुधारणा करून अनुसूचित क्षेत्राच्या स्वायत्त व शास्वत विकासाकरिता पेसा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, गैरआदिवासींना आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये, गट्टा तालुक्याची निर्मिती करून अहेरी जिल्हा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, प्रशासकीय कामात गती आणावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्यावतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे, कार्याध्यक्ष प्रज्ज्वल नागुलवार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)