शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
4
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
5
नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
6
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
7
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
8
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
9
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
10
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
12
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
13
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
14
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
15
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
16
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
17
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
18
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
19
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
20
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवसानंतरही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:04 IST

जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामसभांची नुकसानभरपाई द्या : धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन करताना कायदेशिर बाबींचे पालन होत नसल्यामुळे ती लिज रद्द करावी, या लिजमुळे ग्रामसभेच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय सदर कंपनीचा प्रस्तावित चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉयड स्टिल कंपनीचा लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यात उभारून तिथे स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या, त्यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशीही उपोषणकर्त्यांची मागणी आहे. मात्र त्यांच्या उपोषणाला ५० दिवस पूर्ण झाले तरी अजून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांच्या वतीने सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान जिल्हा ग्रामसभा महासंघाचे देवाजी तोफा व इतर सहकारी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे बारसागडे यांनी सांगितले.प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीतीलसदर उपोषणकर्त्यांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाच्या नाही तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहेत. त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. याशिवाय त्यांनी न्यायालयातही जनहित याचिका टाकलेली आहे. त्यावरील निर्णय येईपर्यंत तरी उपोषणकर्त्यांनी वाट पाहून उपोषण मागे घ्यावे. यासाठी तीन-चार वेळा त्यांची समजूत काढली, मात्र उपोषणकर्ते ही बाब समजून घेण्यास तयार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.