शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

५० दिवसानंतरही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:04 IST

जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामसभांची नुकसानभरपाई द्या : धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन करताना कायदेशिर बाबींचे पालन होत नसल्यामुळे ती लिज रद्द करावी, या लिजमुळे ग्रामसभेच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय सदर कंपनीचा प्रस्तावित चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉयड स्टिल कंपनीचा लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यात उभारून तिथे स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या, त्यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशीही उपोषणकर्त्यांची मागणी आहे. मात्र त्यांच्या उपोषणाला ५० दिवस पूर्ण झाले तरी अजून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांच्या वतीने सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान जिल्हा ग्रामसभा महासंघाचे देवाजी तोफा व इतर सहकारी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे बारसागडे यांनी सांगितले.प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीतीलसदर उपोषणकर्त्यांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाच्या नाही तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहेत. त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. याशिवाय त्यांनी न्यायालयातही जनहित याचिका टाकलेली आहे. त्यावरील निर्णय येईपर्यंत तरी उपोषणकर्त्यांनी वाट पाहून उपोषण मागे घ्यावे. यासाठी तीन-चार वेळा त्यांची समजूत काढली, मात्र उपोषणकर्ते ही बाब समजून घेण्यास तयार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.