शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

२४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

By दिगांबर जवादे | Updated: October 20, 2023 18:49 IST

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

गडचिराेली :  कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनल घारगाव व कळमगाव फिडरच्या शेकडो शेतकऱ्यांनी चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान गर्भात आहे. त्यामुळे आता धानाला पाण्याची खूप आवश्यकता आह़े पाणी न मिळाल्या हातात आलेले धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनलतर्फे भेंडाळा येथील महावितरण कार्यालय च्या समोर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आह़े जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.    काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या                             भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगाव व कळमगाव फिडरचे भार नियमन बंद करावे, भारनियमनामुळे शेतपीक नष्ट होत असेल तर महावितरणने ती जबाबदारी घ्यावी, कृषिवीज बिलांमध्ये सूट द्यावी, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली