शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:58 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.

ठळक मुद्देवर्षभरापासून लाभ नाही : केवळ अर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, मात्र त्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा झाला नाही, अशा शेतकºयांना उच्चदाब प्रणालींतर्गत उच्चदाब लाईन टाकून दिली जात आहे. एप्रिल २०१८ नंतर ज्या शेतकºयांचे अर्ज प्राप्त होत आहेत, त्यांना सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून अर्ज मागविले जात आहेत. कृषीपंपासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून ३ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले. कृषीपंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकºयाला तीन एचपीच्या पंपासाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकºयांना ८ हजार २८० रुपये भरावे लागतात. त्यानंतरच त्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाभरातील १ हजार ८२ शेतकºयांनी डिमांड भरले आहेत.सौर कृषीपंप देण्याची योजना राज्य शासनाने वर्षभरापूर्वी सुरू केली. मात्र अजूनपर्यंत या योजनेंतर्गत अर्ज मागविण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीच नव्हे तर राज्यभरातील एकाही शेतकºयाला वर्षभराचा कालावधी उलटूनही एकही सौरकृषीपंप देण्यात आला नाही. डिमांड भरलेले शेतकरी आपल्याला सौर कृषीपंप कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांसाठी लाभदायकगडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विरळ आहे. अनेक गावे जंगलाने व्यापली आहेत. या जंगलातूनच वीज तारा गेल्या आहेत. वादळवारा झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी घडतात. एकदा वीज खंडीत झाल्यानंतर पुन्हा सुरू होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत सौरकृषीपंप फायदेशीर ठरणार आहे. शेतकºयाला कधीही वीज उपलब्ध होईल.वीज पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात महावितरणचे बरेच कर्मचारी व्यस्त राहतात. त्यातही कृषीपंपासाठी दिलेल्या लाईनवरील बिघाड दुरूस्त करायचा असेल तर शेतात जावे लागते. यामध्ये बराच वेळ व श्रम लागतो. सौर कृषीपंपामुळे हा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे.