शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:58 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.

ठळक मुद्देवर्षभरापासून लाभ नाही : केवळ अर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, मात्र त्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा झाला नाही, अशा शेतकºयांना उच्चदाब प्रणालींतर्गत उच्चदाब लाईन टाकून दिली जात आहे. एप्रिल २०१८ नंतर ज्या शेतकºयांचे अर्ज प्राप्त होत आहेत, त्यांना सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून अर्ज मागविले जात आहेत. कृषीपंपासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून ३ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले. कृषीपंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकºयाला तीन एचपीच्या पंपासाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकºयांना ८ हजार २८० रुपये भरावे लागतात. त्यानंतरच त्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाभरातील १ हजार ८२ शेतकºयांनी डिमांड भरले आहेत.सौर कृषीपंप देण्याची योजना राज्य शासनाने वर्षभरापूर्वी सुरू केली. मात्र अजूनपर्यंत या योजनेंतर्गत अर्ज मागविण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीच नव्हे तर राज्यभरातील एकाही शेतकºयाला वर्षभराचा कालावधी उलटूनही एकही सौरकृषीपंप देण्यात आला नाही. डिमांड भरलेले शेतकरी आपल्याला सौर कृषीपंप कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांसाठी लाभदायकगडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विरळ आहे. अनेक गावे जंगलाने व्यापली आहेत. या जंगलातूनच वीज तारा गेल्या आहेत. वादळवारा झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी घडतात. एकदा वीज खंडीत झाल्यानंतर पुन्हा सुरू होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत सौरकृषीपंप फायदेशीर ठरणार आहे. शेतकºयाला कधीही वीज उपलब्ध होईल.वीज पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात महावितरणचे बरेच कर्मचारी व्यस्त राहतात. त्यातही कृषीपंपासाठी दिलेल्या लाईनवरील बिघाड दुरूस्त करायचा असेल तर शेतात जावे लागते. यामध्ये बराच वेळ व श्रम लागतो. सौर कृषीपंपामुळे हा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे.