शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

धान विक्रीचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम लवकर अदा करावी. या भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. त्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरांगीतील आविका संस्थेकडून दिरंगाई

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्याच्या रांगी येथील आदिवासी विकास कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर सन २०२१ च्या रबी हंगामात आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. मात्र अजूनही धान चुकाऱ्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रलंबित धान चुकाऱ्याची रक्कम व धानाचा बाेनस अदा करण्यात यावा, अशी मागणी खांबाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी कुंडलिक गावतुरे, नक्टू सडमाके, बालाजी वाढई, गाेपाल कापगते, जनू वाढई, अजिम कुरेशी, रामदास वाढई, बायजाबाई निकाेडे, नीलकंठ वाढई, नानाजी वाढई, विनायक सहाकाटे, देवराव सडमाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, रांगी येथील आविका संस्थेच्या केंद्रावर जून २०२१ मध्ये रबी हंगामात धानाची विक्री केली. एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तसेच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.मात्र धान विक्रीची रक्कम न मिळाल्याने ऐन धान पीक राेवणीच्या हंगामात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विक्री केलेल्या धानाची रक्कम लवकर अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते. 

प्रशासकीय दिरंगाईचा फटका- पुंघाटेआदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम लवकर अदा करावी. या भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. त्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य लता पुंघाटे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी