शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धान विक्रीचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम लवकर अदा करावी. या भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. त्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरांगीतील आविका संस्थेकडून दिरंगाई

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्याच्या रांगी येथील आदिवासी विकास कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर सन २०२१ च्या रबी हंगामात आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. मात्र अजूनही धान चुकाऱ्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रलंबित धान चुकाऱ्याची रक्कम व धानाचा बाेनस अदा करण्यात यावा, अशी मागणी खांबाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी कुंडलिक गावतुरे, नक्टू सडमाके, बालाजी वाढई, गाेपाल कापगते, जनू वाढई, अजिम कुरेशी, रामदास वाढई, बायजाबाई निकाेडे, नीलकंठ वाढई, नानाजी वाढई, विनायक सहाकाटे, देवराव सडमाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, रांगी येथील आविका संस्थेच्या केंद्रावर जून २०२१ मध्ये रबी हंगामात धानाची विक्री केली. एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तसेच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.मात्र धान विक्रीची रक्कम न मिळाल्याने ऐन धान पीक राेवणीच्या हंगामात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विक्री केलेल्या धानाची रक्कम लवकर अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते. 

प्रशासकीय दिरंगाईचा फटका- पुंघाटेआदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम लवकर अदा करावी. या भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. त्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य लता पुंघाटे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी