शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:45 IST

कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.

ठळक मुद्देनिर्वाहाच्या शेतीला बगल : कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका लागवडीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.कृषी विकासाच्या दृष्टीने शासनाने विविध योजना राबविण्यास प्राध्यान्य दिल्या ने अनेक शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करीत आहेत. शेतकºयांना अनुदानावर बी-बियाणे, यंत्र, अवजारे तसेच विविध साहित्य दिले जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबिन पिकाची लागवड केली जाते. या पिकांचे उत्पन्न डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यात निघाल्यानंतर भाजीपाला व फळभाज्यांची लागवड शेतकरी करतात. तर बहुतांश शेतकरी कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका आदी नगदी पिकांची लागवड करतात. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सोय करून ही पिके शेतकºयांना सहज शक्य होते. याशिवाय आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर, देलनवाडी, सुकाळा, मोहझरी व कुरखेडा तालुक्यातील कढोली उराडी, घाटी परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामानंतर शेतकरी भूईमुगाची लागवड करतात. हा परिसर या पिकासाठी एकमेव परिसर आहे. खोब्रागडी व वैलोचना नदीच्या काठावरील शेतांमध्ये हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय भाजीपाला व फळभाजी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी शेतकरी ही विशेष शेती करीत आहेत.नदीचे पात्र व काठावरील भाग पिकांसाठी फायदेशीरदशकापूर्वी बाहेरून आलेले व्यावसायिक जिल्ह्यात ठेका पद्धतीने जमीन घेऊन कलिंगडाची लागवड करीत होते. परंतु आता जिल्हाभरात बऱ्याच ठिकाणी शेतकरी स्वत: कलिंगडाची लागवड करतात. तसेच वैनगंगा, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना नदीपात्रात व खरबुजाची लागवड शेतकरी करीत आहे. सध्या हे पीक निघण्यास सुरूवात झाली आहे. यातूनही बराच नफा मिळतो.कारले व काकडी लागवडीतून भरघोस नफाअनेक समारंभात भाजीपाला व फळभाज्यांची मागणी असते. तसेच बाहेरही निर्यात होत असते. देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, किन्हाळा व गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, राजगाटा परिसर कारले लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय उसेगाव, आंबेशिवणी परिसरात काकडीची लागवड शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात केली आहे. यांतून शेतकरी भरघोस नफा मिळवतात.मका पिकाचा आवाका वाढलाजिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शेतीला पाण्याची सोय नसल्याने शेतकरी मका पीक घेण्यास धजत नव्हते. परंतु आता बऱ्याच ठिकाणी सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी मक्याची लागवड करीत आहेत. सिरोंचा, मुलचेरा, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली तालुका यात आघाडीवर आहे.