शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:50 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेतृत्व : एसडीओ कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील काही बाजारपेठसुद्धा बंद होती.मोर्चाचे नेतृत्व विधानसभा उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आ.पेंटारामा तलांडी, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, डॉ.नितीन कोडवते, एटापल्ली तालुका काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गम्पावार, जिल्हा परिषद सदस्य रवी शहा, अहेरीचे तालुकाध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी केले.पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे दर कमी करावे, रेशनसाठी अनुदान न देता धानाचे वितरण करावे, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वृद्ध व निराधार नागरिकांना ९०० रूपये मानधन द्यावे, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरकूल, शेततळे, सिंचन विहिरींचा लाभ द्यावा, धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखा सुरू करावी, पिपली बुर्गी येथे आरोग्य केंद्र सुरू करावे, केरोसीनचे परवाने व वनगौन खरेदी-विक्रीचे अधिकार महिला बचतगटांना द्यावे, रिक्तपदे भरावी, तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, राष्ट्रीयकृत बँकांची संख्या वाढवावी, गट्टा व कसनसूर येथे ३३ केव्हीचे वीज केंद्र सुरू करावे, ग्रामीण भागात बससेवा सुरू करावी, वाळू घाटांचा लिलाव करावा, तेंदूपत्ता मजुरांची थकीत महसुली रक्कम मिळवून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मोर्चादरम्यान सभेचे आयोजन करण्यात आले.सभेदरम्यान मार्गदर्शन करताना आ.विजय वडेट्टीवार यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली. शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे नागरिकांची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली आहे, असा जाब विचारला.एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात बाचाबाचीआ.विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी एटापल्लीचे एसडीएम एस.ए.थेटे यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी उभे राहून निवेदन स्वीकारा, अशी सूचना वडेट्टीवार यांनी एसडीएम यांना दिली. मात्र एसडीएमने उभे राहून निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. पाच पेक्षा जास्त व्यक्ती आतमध्ये कसे आले, असा प्रश्न एसडीएमने उपस्थित केला. तर एसडीएम उभे न राहिल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत टाकला जाईल, अशी तंबी एसडीएम यांना दिली. त्यानंतर एसडीएमने कार्यालयासमोर येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी एसडीएम यांना लोकमतने विचारणा केली असता, आयोजकांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, असे आपल्याला सांगितले असते तर आपण त्यासाठी तयार होतो. कार्यालयात पाच पेक्षा अधिक व्यक्ती येणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप