शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

नदी काठावरच्या शेतीला शेतकऱ्यांची विशेष पसंती

By admin | Updated: December 28, 2015 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ते दोन एकर शेती उपलब्ध आहे. त्यातही त्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या शेतीमध्ये हलक्या धानाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेऊ शकत नाही. परिणामी शेतकरी वर्ग आता नदी, नाल्यांमध्ये शेती करण्याकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना एप्रिल, मे पर्यंत पाणी राहते. या कालावधीपर्यंत भाजीपाला किंवा इतर रबी पीक सहज निघू शकते. याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे. परिणामी वैनगंगा, कठाणी, पाल, सती, पर्लकोटा, गोदावरी, इंद्रावती आदी नद्यांच्या काठावर तसेच आतील भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. जवळच पाणी राहत असल्याने पाणी देण्याचा खर्चही अधिक आहे. चालू रबी हंगामात नदी काठावर सुमारे दोन हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी नदी काठावरील व पात्रात शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पिकांसाठी रासायनिक खते व कीटकनाशके टाकली जातात. त्यामुळे पाणी दूषित होत चालले आहे. (नगर प्रतिनिधी)