शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरच्या शेतीला शेतकऱ्यांची विशेष पसंती

By admin | Updated: December 28, 2015 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ते दोन एकर शेती उपलब्ध आहे. त्यातही त्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या शेतीमध्ये हलक्या धानाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेऊ शकत नाही. परिणामी शेतकरी वर्ग आता नदी, नाल्यांमध्ये शेती करण्याकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना एप्रिल, मे पर्यंत पाणी राहते. या कालावधीपर्यंत भाजीपाला किंवा इतर रबी पीक सहज निघू शकते. याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे. परिणामी वैनगंगा, कठाणी, पाल, सती, पर्लकोटा, गोदावरी, इंद्रावती आदी नद्यांच्या काठावर तसेच आतील भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. जवळच पाणी राहत असल्याने पाणी देण्याचा खर्चही अधिक आहे. चालू रबी हंगामात नदी काठावर सुमारे दोन हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी नदी काठावरील व पात्रात शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पिकांसाठी रासायनिक खते व कीटकनाशके टाकली जातात. त्यामुळे पाणी दूषित होत चालले आहे. (नगर प्रतिनिधी)