शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वाळवंटी टोळीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचे आवाहन : जिल्ह्यात मोठ्या नुकसानीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात थैमान घातलेली वाळवंटी टोळ (नाकतोडे) महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहून या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.बी.उंदीरवाडे यांनी केले आहे.वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.यावर्षी या किडीने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच १५ दिवसानंतर खरिपाच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. या कालावधीत सदर वाळवंटी टोळ जिल्ह्यात आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांतच खरीप हंगामातील धान पऱ्हे टाकण्याच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वाळवंटी टोळचा जीवनक्रमअंडी अवस्था :-वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये १० ते १५ सेमी खोलात टाकते. एक मादी जवळपास १५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमान व आद्रतेवर अवलंबून राहते. साधारणपणे १० ते १२ दिवसांत अंडी उबवतात.पिल्ले :-अंडी उबवल्यानंतर यातून पिल्ले बाहेर पडतात. सुरूवातीच्या अवस्थेत पिल्ल्यांना पंख नसतात. या पिल्ल्यांच्या पाच अवस्था आढळतात. तापमान जर ३७ अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तर २२ दिवसांत पिल्लांची अवस्था पूर्ण होते. तापमान कमी असेल तर ७० दिवस लागतात.प्रौढ :-पाचव्या अवस्थेतील पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. हीच अवस्था सर्वाधिक नुकसानकारक ठरते. थंड वातावरणात ही कीड जवळपास आठ महिन्यांपर्यंत जिवंत राहते. अन्नाच्या शोधात प्रौढ टोळ हवेच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जातात. त्यामुळे अधिकाधिक शेतातील पिकांपर्यंत पोहोचून ते पीक फस्त करतात. प्रौढ टोळ मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असते.टोळ किडीचे व्यवस्थापनशेतात टोळ आल्यास शेतकऱ्यांनी वाद्य वाजवावे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुपूपांवर टोेळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवाव्या. टायर जाळून धूर करावा. पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भातामध्ये फिप्रोनील ५ एससी, ३ मिली मिसळावे. त्याचे ढीग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. सदर अन्न खाल्ल्यानंतर कीड मरण पावते. टोळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी टोळ विश्रांतीसाठी झाडाझुडूूपांवर बसून राहते. या कालावधीत फवारणी केल्यास टोळीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांनी फवारणी करू नये.

टॅग्स :agricultureशेती