शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

वाळवंटी टोळीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचे आवाहन : जिल्ह्यात मोठ्या नुकसानीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात थैमान घातलेली वाळवंटी टोळ (नाकतोडे) महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहून या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.बी.उंदीरवाडे यांनी केले आहे.वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.यावर्षी या किडीने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच १५ दिवसानंतर खरिपाच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. या कालावधीत सदर वाळवंटी टोळ जिल्ह्यात आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांतच खरीप हंगामातील धान पऱ्हे टाकण्याच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वाळवंटी टोळचा जीवनक्रमअंडी अवस्था :-वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये १० ते १५ सेमी खोलात टाकते. एक मादी जवळपास १५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमान व आद्रतेवर अवलंबून राहते. साधारणपणे १० ते १२ दिवसांत अंडी उबवतात.पिल्ले :-अंडी उबवल्यानंतर यातून पिल्ले बाहेर पडतात. सुरूवातीच्या अवस्थेत पिल्ल्यांना पंख नसतात. या पिल्ल्यांच्या पाच अवस्था आढळतात. तापमान जर ३७ अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तर २२ दिवसांत पिल्लांची अवस्था पूर्ण होते. तापमान कमी असेल तर ७० दिवस लागतात.प्रौढ :-पाचव्या अवस्थेतील पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. हीच अवस्था सर्वाधिक नुकसानकारक ठरते. थंड वातावरणात ही कीड जवळपास आठ महिन्यांपर्यंत जिवंत राहते. अन्नाच्या शोधात प्रौढ टोळ हवेच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जातात. त्यामुळे अधिकाधिक शेतातील पिकांपर्यंत पोहोचून ते पीक फस्त करतात. प्रौढ टोळ मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असते.टोळ किडीचे व्यवस्थापनशेतात टोळ आल्यास शेतकऱ्यांनी वाद्य वाजवावे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुपूपांवर टोेळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवाव्या. टायर जाळून धूर करावा. पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भातामध्ये फिप्रोनील ५ एससी, ३ मिली मिसळावे. त्याचे ढीग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. सदर अन्न खाल्ल्यानंतर कीड मरण पावते. टोळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी टोळ विश्रांतीसाठी झाडाझुडूूपांवर बसून राहते. या कालावधीत फवारणी केल्यास टोळीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांनी फवारणी करू नये.

टॅग्स :agricultureशेती