शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कामाशिवाय परतले शेतकरी

By admin | Updated: July 21, 2016 01:31 IST

शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले

पोटगावचे तलाठी कार्यालय बंद : कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून देण्याची मागणी देसाईगंज : शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले मिळविण्यासाठी शेतकरी व नागरिक तलाठी कार्यालयात दाखल होत आहेत. परंतु साजामध्ये तलाठी हजर राहत नाही. व त्यांचा ठावठिकाणाही दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पोटगाव येथे मंगळवार १९ जुलै रोजी घडला. विविध दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे गावाकडे परतावे लागले. सध्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना मिळणारी कागदपत्रे संगणकीकृत करण्यासाठी आजतागायत सर्वच तलाठ्यांना कामाला लावून ती करवून घेतली व होतही आहेत. त्यामुळे तलाठ्यांची स्थिती ‘तळ्यात, मळ्यात’ अशी होती. परंतु तलाठी साजात हजर राहत नाही व तहसील कार्यालयातही दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखल्यांसाठी वणवण भटकावे लागते. पोटगाव येथे मंगळवारी कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय बंद दिसल्यामुळे रिकाम्या हातानेच स्वगावी परतावे लागले. महिन्यातील बरेच दिवस तलाठी कार्यालय बंद असते. येथील नेमके कामाचे स्वरूप कोणालाच माहित नाही. त्यामुळे अनेकांना काम न होताच खाली हाताने परतावे लागते, असे एका इसमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (तालुका प्रतिनिधी) तलाठी सुटीवर की कर्तव्यावर? पोटगावसह इतरही तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाही. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते तहसील कार्यालयातही आढळून येत नाही. त्यामुळे तलाठी सुटीवर की कर्तव्यावर असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. संबंधित कर्मचारी हजर नसताना नोटीस बोर्डवर अशा सूचना लावणे गरजेचे असते. परंतु सूचना लावल्या जात नाही. तलाठ्यासह कोतवालही कार्यालयात हजर राहत नसल्याने विविध कामासाठी लागणारे दाखले तहसील कार्यालयात संगणकीय कामकाजाचे दिवस, साजात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून द्यावे, अशा सूचना नोटीस बोर्डवर लिहाव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.