शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

सातबारावर झाडांच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:36 IST

गडचिरोली : शासनाच्या विविध वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या सागवान झाडांची नोंद सातबारावर घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ...

गडचिरोली : शासनाच्या विविध वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या सागवान झाडांची नोंद सातबारावर घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे संयुक्त मोजणी, पंचनामे ही सर्व प्रक्रिया स्थानिक स्तरावरच होत असताना केवळ नोंदणीची औपचारिकता करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असल्यामुळे या प्रक्रियेला नाहक विलंब लागत आहे.

चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काही सागवान झाडांची लागवड केली. शेती पिकासारखी त्याची जोपासणा केली. आता ती झाडे मोठी झाली. नियमित पिकांसाठी ती झाडे आता अडचणीची ठरत असल्यामुळे त्या झाडांची तोड करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी आधी त्या झाडांची सातबारावर नोंद करणे आवश्यक असल्याने स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यांच्या आदेशानुसार तलाठी, वन सर्वेक्षक यांच्या उपस्थितीत भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे संयुक्त मोजणीही करण्यात आली. त्यामुळे झाडांच्या सातबारावरील नोंदणीची प्रक्रिया एसडीओ स्तरावर पूर्ण होणे अपेक्षिताना मोजणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच सातबारावर त्या झाडांची नोंद घेतली जाते. या प्रक्रियेत नाहक वेळ जात आहे.

शेतातील झाडे नोंद करण्याचे अधिकार राजस्व निरीक्षकास प्रदान करण्यात आले असताना केवळ सागांच्या झाडांसाठी वेगळा नियम का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

(बॉक्स)

लालफितशाहीमुळे शेतकऱ्यांना त्रास

कृषी, वन, सामाजिक वनिकरण विभागाद्वारा शेताच्या धुऱ्यावर व बांधावर झाडे लावण्याची योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना फुकटात झाडे दिली जातात. परंतू राजस्व खात्याच्या आडमुठे धोरणामुळे आणि नोंदीपासून तर तोडाईपर्यंत कराव्या लागणाऱ्या पायपिटीमुळे शेतकरी बांधावर झाडे लावण्याच्या योजनेला कमी प्रतिसाद देताना दिसत आहेत. शासनाने ही बाब लक्षात घेऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

(कोट)

सागाच्या झाडांची नोंद किंवा कटाई याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच आहेत. गडचिरोलीच जिल्हाच नाही तर सर्व राज्यात ही स्थिती आहे. याबाबतचा रितसर प्रस्ताव एसडीओ कार्यालयामार्फत जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही.

- उत्तम तोडसाम

उपविभागीय अधिकारी, चामोर्शी