शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST

पावसाचे मघा नक्षत्र १६ ऑगस्टपासून सुरू झाले व पहिले चरण होऊनही अपेक्षित पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतित दिवस काढत ...

पावसाचे मघा नक्षत्र १६ ऑगस्टपासून सुरू झाले व पहिले चरण होऊनही अपेक्षित पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतित दिवस काढत आहेत.

दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसाचे शिंतोडे पडतात. हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊन निघून जातो आता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा पल्लवित होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो. जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला आहे .

आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी शेतातून परत येत असतो. तालुक्यांत वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकची चिंता आहे. पुन्हा पाऊस आला तर उद्याला शेतातील कामे कुठून सुरू करायची याचे नियोजन करू लागतो. हा उपक्रम मागील काही दिवसांपासून तालुक्यात पहावयास मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोरवेल, विहीर, तलाव, नहर व नाल्याच्या पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाण्याची सोय होत आहे तर वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस दमदार पावसाची वाट पहावी लागेल हे सांगणे कठीण आहे.

250821\img_20210825_122255.jpg

धान पट्ट्यात पावसाची हुलकावणी शेतकरी चिंतातुर रोवणी झालेल्या धानाचे फोटो