शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:33 IST

पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे.

ठळक मुद्देएकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्जाचे वितरण : या आठवड्यात कर्ज वितरणाची गती वाढेल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. या आठवड्यात कर्ज वितरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो. या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाºयांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २० जूनपर्यंत केवळ ११ हजार ११३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक आहे.बँकनिहाय कर्जाचे वितरणकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. २० जूनपर्यंत ८ हजार ६६८ शेतकऱ्यांना २९ कोटी ६१ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने ४ कोटी ५९ लाख, बँक आॅफ महाराष्टÑने २ कोटी ६६ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १४ लाख, आयडीबीआय बँक ३६ लाख, एसबीआय २ कोटी १४ लाख, युनियन बँक ३४ लाख, विजया बँक २ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ४ कोटी २ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. काही शेतकºयांचे मागील १५ दिवसांत कर्जमाफ झाले आहे. हे शेतकरी आता पुन्हा बँकांकडे कर्जासाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे कर्ज वितरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी