शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:36 IST

आरमोरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, आदी मागण्यांसह विविध समस्यांना घेऊन काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदन तहसीलदार यशवंत धाईत यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात चर्चा : तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, आदी मागण्यांसह विविध समस्यांना घेऊन काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदन तहसीलदार यशवंत धाईत यांनी स्वीकारले.नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व उद्योग विरहीत गडचिरोली जिल्ह्याचे धान हे प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. मात्र यंदा अखेरच्या पाण्याअभावी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ.आनंदराव गेडाम पं.स.चे माजी सभापती अशोक वाकडे, जि.प.चे माजी सभापती आनंदराव आकरे, पं.स.चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, आरमोरी विधानसभा युवक काँगे्रसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, आदिवासी आघाडीचे सचिव दिलीप घोडाम, नरेंद्र गजभिये तसेच अशोक भोयर, धनंजय बन्सोड, विश्वनाथ मेश्राम, संजय मडावी, भोलेनाथ धानोरकर, रवींद्र रोहणकर, अशोक बावणे, राधेश्याम मैंद, दत्तू सोमनकार, पुरूषोत्तम मैंद, प्रा.एम.एम.मेश्राम, विजय धकाते, श्यामराव नैताम, योगेंद्र चापळे, चंद्रशेखर किरमे, गोविंदा कुकुडकार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धानपीक एन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. तालुक्यासह जिल्हाभरात धानपिकांना अखेरचे एक पाणी आवश्यक होते. शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड केली. मात्र प्रयत्न अपुरे पडले.निवेदनातील मागण्याजिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये इतकी आर्थिक मदत जाहीर करावी, कृषी साहित्य, खते, कीटकनाशके व शेती अवजारे यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, शेती व घर बांधकामासाठी अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे, घरगुती व शेतीकरिता वापरात असलेल्या विजेवरील अधीभार व विविध कर कमी करून विद्युत दरवाढ कमी करावे, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, शेतकºयांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम सरसकट सक्तीने कपात न करता पीकविमा इच्छीक करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.