शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 4, 2014 23:08 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

८ डिसेंबर रोजी : विजय वडेट्टीवार यांचे शेतकऱ्यांना आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत येथे केले राज्यात यावर्षी अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. परिणामी कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये व बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदतीचे पॅकेज शासनाने जाहीर करावे, शासनाने तांदळाची निर्यात बंद केली असल्याने धानाचा भाव मागील वर्षीच्या तुलनेत ४०० ते ५०० रूपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. कापसालासुध्दा अत्यंत कमी भाव दिला जात आहे. केंद्र शासनाने धान व कापूस यांच्या हमी भावात यावर्षी केवळ ५० रूपयांनी वाढ केली तर सोयाबीनच्या भावात एकही रूपया वाढ केली नाही. त्यामुळे ही कापूस, सोयाबीन व धानाच्या किमती कमी झाल्या आहेत. या सर्व बाबींसाठी केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यात दुष्काळ घोषीत करण्याबरोबरच पीक कर्ज पूर्णपणे माफ करावे व शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथील घटनेला दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपवावा, अशीही मागणी आ. वडेट्टीवार यांनी केली. भाजप सरकारने निवडणूक काळात दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. राम मेश्राम उपस्थित होते.