शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: August 2, 2015 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने

आत्मांतर्गत कार्यक्रम : सहा महिन्यानंतर एकही फळ आले नाहीगडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने २०१० पासून विविध उपक्रम कृषी विभाग चालवित आहे. याच उपक्रमांतर्गत सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात असलेल्या आत्मा या कृषी विभागाच्या कार्यालयाने जिल्ह्यात सहा हजार कलमांचे वाटप हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना केले. बाराही तालुक्यात या कलमांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल बोरचे उत्पन्न सुरू होईल, अशी माहिती आत्माच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कलमा वितरित करताना दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अ‍ॅपल बोरच्या कलमांची लागवड आपल्या शेतात केली. अ‍ॅपल बोरच्या कलमा पश्चिम महाराष्ट्रातील पुरवठादाराकडून मागविण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. आत्माचे प्रकल्प संचालक हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या हितसंबंधातून हा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. कलमा लावून त्याची योग्य पध्दतीने निगा राखल्यानंतरही सहा महिने उलटल्यावर बहुतांश झाडाला बोर लागलेच नाही. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आत्माच्या कार्यालयाकडे या बाबतची मौखिक तक्रार केली. आता प्रकल्प संचालकांनी हात वर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याची जमीन चुनखडीचे प्रमाण अधिक असलेली आहे. त्यामुळे कदाचित बोराचे उत्पादन आले नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आत्माचे संचालक हे कृषितज्ज्ञ असतात. त्यांना जमिनीचा अभ्यास असतोच. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीचा पूर्व अभ्यास न करता केवळ सरकारी अनुदान खर्च करण्यासाठी त्यांनी अ‍ॅपल बोरचा हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सरकारी निधीचा अपव्यय केला, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या कलमा घेतल्या त्यांनाही कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यांचीही फार मोठी फसवणूक आत्माच्या अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या कलमांचा पुरवठादार व गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्यावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोणताही अधिकारी येऊन शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीच्या नावावर नानाविध उपक्रम सांगत असतो व शेतकरी नागविला जातो, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारे झाड म्हणून अ‍ॅपल बोरचे वितरण मागील वर्षी करण्यात आले. या अ‍ॅपल बोरला वर्ष उलटूनही फळे लागली नाही. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात चुनखडीचे प्रमाण असावे, त्यामुळे झाडाला फळे लागली नाही. काही झाडांना फळे येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.- अनंत पोटे, प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली