शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: August 2, 2015 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने

आत्मांतर्गत कार्यक्रम : सहा महिन्यानंतर एकही फळ आले नाहीगडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने २०१० पासून विविध उपक्रम कृषी विभाग चालवित आहे. याच उपक्रमांतर्गत सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात असलेल्या आत्मा या कृषी विभागाच्या कार्यालयाने जिल्ह्यात सहा हजार कलमांचे वाटप हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना केले. बाराही तालुक्यात या कलमांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल बोरचे उत्पन्न सुरू होईल, अशी माहिती आत्माच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कलमा वितरित करताना दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अ‍ॅपल बोरच्या कलमांची लागवड आपल्या शेतात केली. अ‍ॅपल बोरच्या कलमा पश्चिम महाराष्ट्रातील पुरवठादाराकडून मागविण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. आत्माचे प्रकल्प संचालक हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या हितसंबंधातून हा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. कलमा लावून त्याची योग्य पध्दतीने निगा राखल्यानंतरही सहा महिने उलटल्यावर बहुतांश झाडाला बोर लागलेच नाही. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आत्माच्या कार्यालयाकडे या बाबतची मौखिक तक्रार केली. आता प्रकल्प संचालकांनी हात वर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याची जमीन चुनखडीचे प्रमाण अधिक असलेली आहे. त्यामुळे कदाचित बोराचे उत्पादन आले नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आत्माचे संचालक हे कृषितज्ज्ञ असतात. त्यांना जमिनीचा अभ्यास असतोच. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीचा पूर्व अभ्यास न करता केवळ सरकारी अनुदान खर्च करण्यासाठी त्यांनी अ‍ॅपल बोरचा हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सरकारी निधीचा अपव्यय केला, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या कलमा घेतल्या त्यांनाही कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यांचीही फार मोठी फसवणूक आत्माच्या अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या कलमांचा पुरवठादार व गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्यावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोणताही अधिकारी येऊन शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीच्या नावावर नानाविध उपक्रम सांगत असतो व शेतकरी नागविला जातो, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारे झाड म्हणून अ‍ॅपल बोरचे वितरण मागील वर्षी करण्यात आले. या अ‍ॅपल बोरला वर्ष उलटूनही फळे लागली नाही. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात चुनखडीचे प्रमाण असावे, त्यामुळे झाडाला फळे लागली नाही. काही झाडांना फळे येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.- अनंत पोटे, प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली