शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबाने राष्ट्रपतींकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

By admin | Updated: September 29, 2016 01:35 IST

आरमोरी तालुक्याच्या वडधा, बोरी येथील बोगस शेतीविक्री प्रकरणात बळी पडलेल्या व गेल्या तीन वर्षांपासून स्वत:च्या शेतीसाठी न्यायालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या सूर्यभान येवले,

न्यायालयात धाव घेऊनही येवले कुटुंबीयांना न्याय नाही : बोगस विक्रीपत्र तयार करून २ हेक्टर ५२ आर शेतजमीन हडपल्याचे प्रकरणजोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या वडधा, बोरी येथील बोगस शेतीविक्री प्रकरणात बळी पडलेल्या व गेल्या तीन वर्षांपासून स्वत:च्या शेतीसाठी न्यायालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या सूर्यभान येवले, मुरलीधर येवले अशा चार भावंडाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. वडसा साजा क्रमांक १५ अंतर्गत टेंभाचक येथील भू मापन क्रमांक १११ खाते क्रमांक १०६ वरील दोन हेक्टर ५२ आर शेतजमीन लालाजी येवले (मयत) भाऊ सूर्यभान येवले, श्यामराव येवले, मुरलीधर येवले या शेतकरी भावंडांनी विकून दुसरीकडे जास्त जमीन विकत घेण्यासाठी १४ मार्च १९८० रोजी येथीलच मुकूंदा गणुजी कोलते सोबत १८ हजार रूपयात सौदा करून पाच हजार रूपये बयाना घेण्यात आले. ११ फेब्रुवारी १९८९ ला विक्रीपत्र करण्याचे ठरले. मात्र विक्रीची तारीख जाऊनही जमीन खरेदीकर्ते मुकूंदा कोलते यांनी उर्वरित रक्कम देऊन विक्रीपत्र आपल्या नावे करून घेण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकरणी सहा महिन्यानंतर आॅगस्ट १९८१ मध्ये न्यायालयात केस दाखल करण्यात आली. न्यायालयाने २६ मार्च २०१४ ला मुकूंदा कोलते यांचे नावे गैरकानुनी विक्री करून दिली. उर्वरित १३ हजार रूपये न्यायालयात भरण्यात आले. मात्र आजपर्यंत सदर रक्कम येवले कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. उलट स्वत:च्या जमिनीवर पाय ठेवणाऱ्या या गरीब शेतकऱ्यांना पोलिसांचे फटके खावे लागले. शेतजमीन बळजबरीने हिरावून घेतल्याने येवले कुटुंब भूमिहिन झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात न्यायालयात केस दाखल करूनही तीन वर्षांपासून न्याय व्यवस्थेकडून येवले कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रपतींकडे अखेर इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. कोर्ट स्टॅम्पवर पाच हजार बयाना रक्कम घेताना ११ फेब्रुवारी १९८१ ला उर्वरित १३ हजार रूपये देऊन विक्रीपत्र मुकूंदा कोलते यांच्या नावे करून द्यायचे, विक्री करून देण्यास शेतीमालक तयार नसल्यास शेती घेणारा त्या तारखेपासून शेतजमिनीवर ताबा करेल. खरेदी करणाऱ्याने पैसे देऊन विक्री केली नाही तर सदर सौदा रद्द केला जाईल, असे स्टॅम्पमध्ये नमूद केले होते. (वार्ताहर)