शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांचा घात

By admin | Updated: March 10, 2016 02:32 IST

महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत.

संकटे संपेना : शेतकऱ्यांची मुले शिकूनही बेरोजगारसासरा : महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत. राज्यात खेड्यापाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुले ग्रामपंचायत कार्यालयात तसेच इतर कार्यालयात डाटा आॅपरेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढून नियमित करू, असे आश्वासन विधीमंडळ अधिवेशनात दिले होते. त्या अनुषंगाने अद्यापही काहीच हालचाल होत नसल्याचे दिसताच भावी आयुष्याचे चित्र रंगवित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचे बेहाल होत असल्याचे चित्र आहे.यापूर्वीच्या सरकारने ए.पी.एल. कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून राशन पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून गरीब शेतकऱ्यांचे हित जोपासले होते. ते मिळणारे धान्य सद्याच्या सरकारने बंद केले आहे. नापिकी, दुष्काळी आदी कारणाने धान्याचे अत्यल्प उत्पान होऊ लागले. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे धान्य कोठून आणावे? मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या कशा सोडवाव्यात? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. अच्छे दिनांच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांचा घात होत आहे.यापूर्वी महाराष्ट्रातील नागरिक चुलीवर स्वयंपाक करत होते. त्यासाठी इंधन म्हणून लाकडांंचा उपयोग करत होते. अलिकडे वृक्षांचा तुटवडा पडला आहे. वृक्षतोडीवर बंदी आहे. बदलत्या युगात नवनवीन संशोधने लागली आहेत. नवीन सोई सुविधा स्वीकारल्या जात आहेत. चुलीवरच्या स्वयंपाकाला फाटा दिल्या गेल्याने सिलेंडर गॅस सुविधा विकसीत झाली. बदलत्या काळातील बदलत्या सोई सुविधा सहर्ष स्वीकारण्यात येऊ लागल्या. ज्यांचेकडे स्वयंपाकासाठी गॅस सुविधा आहे. अशांना रॉकेल विक्री केंद्रातून राशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. असा फतवा काढण्यात आला. गॅस सुविधेने स्वयंपाक करता येतो. पण वीज खंडीत झाल्यास घरात प्रकाशासाठी उपयोग करता येत नाही. एखाद्या कुटुंबाने काटकसर तसेच पदरमोड करून पैसे संचयित केले. परिवर्तन काळाची गरज आहे. हे ओळखून गॅस कनेक्शन विकत घेतला. एखाद्याने काटकसर करून, अर्धपोटी उपाशी राहून गॅस कनेक्शन घेतला. म्हणजे तो श्रीमंत गर्भश्रीमंत झाला असे समजणे संयुक्तीक वाटत नाही. कुठेतरी शासन, गरीब जनतेवर अन्याय करत आहे हे सिद्ध होत आहे. तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे राहिले अशी अवस्था आहे.तांत्रिक बिघाडाने, नैसर्गिक आपत्तीने जेव्हा विद्युत खंडीत होते. तेव्हा घरात प्रकाश पुरविण्यासाठी रॉकेलची गरज असते. म्हणून एपीएल, बीपीएल, अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य घेणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्डधारकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा अशी शेतकरी, शेतमजूर पालकांनी मागणी केली आहे. वित्तीय वर्षात डाटा आॅपरेटर्सना आपापल्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. डाटा आॅपरेटर्सना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)