शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी असमाधानी

By admin | Updated: August 26, 2015 01:11 IST

दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे,

लोकमत सर्वेक्षण : शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करू नयेगडचिरोली : दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने लोकमतने गडचिरोली जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये १०० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात प्रत्यक्ष प्रश्नावलीच्या आधारे शेतकऱ्यांशी त्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता शेतीच्या व्यवसायावर समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. विविध उत्पन्न गटातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच विविध वयोगटातील शेतकऱ्यांशीही मुक्त संवाद करण्यात आला. त्यातून पुढे आलेले हे चित्र वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३९६ शेतकरी आहेत. यातील शुन्य ते एक हेक्टर शेती असणारे ४३ हजार ६४९, एक ते दोन हेक्टर शेती असणारे ३६ हजार ३०६ व दोन हेक्टरच्या वर शेती असणारे ३५ हजार ४४१ शेतकरी आहेत. लोकमतने चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज या कमी-अधिक प्रमाणात सिंचन व्यवस्थेची सोय असलेल्या तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची सर्वेक्षणासाठी नमुना म्हणून निवड केली. त्यांच्याकडून १० प्रश्न असलेल्या प्रश्नावलीच्या आधारे चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतून शेतकऱ्यांच्या विविध परिस्थितीचे विदारक वास्तव समोर आले. हे वास्तव राज्यकर्त्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना व्हाव्यात, अशी लोकमतची प्रामाणिक इच्छा यामागे आहे. असा झाला सर्वेक्षणाचा प्रवास३० हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या २० टक्के शेतकऱ्यांचा सर्वेक्षणात सहभाग होता. ३० ते ५० हजारापर्यंत उत्पन्न असणाऱ्या २५ टक्के शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. एक लाख ते दीड लाख उत्पन्न असणाऱ्या १५ टक्के शेतकऱ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. दीड ते दोन लाख उत्पन्न असणारे १० टक्के व दोन ते तीन लाख उत्पन्न असणारे ८ टक्के शेतकरी या सर्वेक्षणात सहभागी झाले.