शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: February 28, 2017 00:51 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

रेगडी जलाशय : कालवा खोदण्याची १४ गाववासीयांची मागणीभाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत. इतर गावांना ज्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे १४ गावातील शेतकऱ्यांना जलाशयातून कालवा खोदून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेले कन्नमवार जलाशय होय. १९६२ मध्ये चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगत वाहणाऱ्या दिना नदीवर धरण बांधून तालुक्यातील ६६ गावातील ९ हजार ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. असे असले तरी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतींना दिना धरणाचे पाणी मिळत नाही. धरणाचा कालवा जात असला तरी शेतीला पाणी मिळ नाही. अशी स्थिती आहे. त्यामुळे १४ गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन कालवा बांधून शेतीला पाणी देण्याची मागणी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दिना धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मक्केपल्ली, गोलबोंदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सीमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मछली आदी १४ गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सदर गावातील शेतीही उंच भागात विस्तारली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन पुरवठा केल्या जाऊ शकते, अशी फार जुनी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांची आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करतात मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आजवर दिलेले आश्वासन केवळ दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)