शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: February 28, 2017 00:51 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

रेगडी जलाशय : कालवा खोदण्याची १४ गाववासीयांची मागणीभाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत. इतर गावांना ज्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे १४ गावातील शेतकऱ्यांना जलाशयातून कालवा खोदून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेले कन्नमवार जलाशय होय. १९६२ मध्ये चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगत वाहणाऱ्या दिना नदीवर धरण बांधून तालुक्यातील ६६ गावातील ९ हजार ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. असे असले तरी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतींना दिना धरणाचे पाणी मिळत नाही. धरणाचा कालवा जात असला तरी शेतीला पाणी मिळ नाही. अशी स्थिती आहे. त्यामुळे १४ गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन कालवा बांधून शेतीला पाणी देण्याची मागणी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दिना धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मक्केपल्ली, गोलबोंदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सीमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मछली आदी १४ गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सदर गावातील शेतीही उंच भागात विस्तारली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन पुरवठा केल्या जाऊ शकते, अशी फार जुनी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांची आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करतात मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आजवर दिलेले आश्वासन केवळ दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)