शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

कलिंगडाच्या शेतीकडे वळतोय शेतकरी

By admin | Updated: November 9, 2014 23:20 IST

धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक

गडचिरोली : धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जाणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्याय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल, तुर, हरभरा, मम्मा, ज्वारी, गहू, लाखोळी, तीळ, करडई, भूईमूंग, मोहरी आदी प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र या पिकांपासून पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला लाभ मिळत नाही. कधीकधी तोट्याचाही सामना करावा लागतो. दरवर्षीच्या या कटकटीला त्रासून जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळत चालला आहे. बाजारपेठेत कलिंगडाला चार महिने मागणी राहते व चांगला भाव मिळत असल्याने दरवर्षी कलिंगडाच्या शेतीचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील वर्षी सुमारे ७०० हेक्टरवर कलिंगडाची शेती करण्यात आली होती. यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची शेती केली जाणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कलिंगडाची लागवड सध्या सुरू झाली असून दीड महिन्यात हे पीक हातात येणार आहे. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९० टक्के राहत असल्याने उन्हाळ्यात या फळाची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. ज्या शेतीला उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाठिकाणी हे पीक घेतले जाते. पूर्वी या पिकाची लागवड काही विशिष्ट शेतकरीच करीत होते. त्यांच्याकडून अनुभव घेतल्यानंतर स्वत:च शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करणे सुरू केले आहे. काही शेतकरी दुसऱ्याला कसण्यासाठी देत आहेत. यातून सदर शेतकऱ्यालाही अधिकचा पैसा मिळत आहे. कलिंगडाची लागवड उन्हाळभर चालत असल्याने यातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे स्थलांतरीत होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. विशेष म्हणजे कलिंगडाच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांमधील उत्साह वाढीस लागला आहे. (नगर प्रतिनिधी)