शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनो, हक्कासाठी कारागृहात जाण्याची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:24 IST

शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत शेतकरी मेळावा : शंकरअण्णा धोंडगे यांचे आवाहन; शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याची स्थानिक नेत्यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे. नैसगिक धोके शेतकरी स्वीकारतात. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडूनही शेतकºयांसाठी धोके निर्माण केले जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या विरोधात शेतकºयांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्याची आता गरज आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार किसान मंच समिती महाराष्टÑाचे संयोजक तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे पाटील यांनी केले.किसान मंचच्या वतीने शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये शेतकरी व शेतमजूर मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार होते. यावेळी मंचावर किसान मंचच्या कार्यकारी समितीचे सदस्य किशोर माथनकर, दत्ता पवार, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्णे, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, नामदेव गडपल्लीवार, प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. संजय ठाकरे, माजी नगरसेवक विजय गोरडवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.सरकारकडून भारतातील ६८ पिकांचे शोषण होत आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर भात, दुसºया क्रमांकावर ज्वारी त्यानंतर इतर पिकांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, ऊस पीक उत्पादक शेतकºयांचे आजवर कधीही सरकारकडून शोषण झाले नाही. विद्यमान सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून कृषी क्षेत्रात जाणीवपूर्वक उपद्व्याप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा असुरक्षित व निराधार झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व न्यायाकरिता महाराष्टÑात किसान मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचच्या माध्यमातून सरकारला शेतकºयाच्या हिताचे निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. हे आंदोलन लवकरच होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे नेते व शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी किशोर माथनकर, दत्ता पवार, अतुल गण्यारपवार, जगन्नाथ बोरकुटे आदींनी शेतकºयांच्या दयनिय परिस्थितीवर प्रकाश टाकून विद्यमान भाजपप्रणित सरकार शेतकºयांप्रती सकारात्मक नाही, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, संचालन माजी नगरसेवक विजय गोरडवार यांनी केले. कार्यक्रमाला महेंद्र ब्राह्मणवाडे, विवेक ब्राह्मणवाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.सरकार निगरगट्टचमाजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात भात व इतर कृषी शेतमालात भारत देश आघाडीवर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान मोठ-मोठी आश्वासने दिली. पंतप्रधान झाल्यावर अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्वास आली नाही. शेतकºयांच्या शेतमालाला ५० टक्के नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनही केंद्र सरकारने पाळले नाही. शेतकºयांच्या प्रती एवढे निगरगट्ट सरकार आपण कधीही पाहिले नाही, असे शंकरअण्णा म्हणाले.