शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनो, हक्कासाठी कारागृहात जाण्याची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:24 IST

शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत शेतकरी मेळावा : शंकरअण्णा धोंडगे यांचे आवाहन; शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याची स्थानिक नेत्यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे. नैसगिक धोके शेतकरी स्वीकारतात. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडूनही शेतकºयांसाठी धोके निर्माण केले जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या विरोधात शेतकºयांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्याची आता गरज आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार किसान मंच समिती महाराष्टÑाचे संयोजक तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे पाटील यांनी केले.किसान मंचच्या वतीने शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये शेतकरी व शेतमजूर मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार होते. यावेळी मंचावर किसान मंचच्या कार्यकारी समितीचे सदस्य किशोर माथनकर, दत्ता पवार, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्णे, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, नामदेव गडपल्लीवार, प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. संजय ठाकरे, माजी नगरसेवक विजय गोरडवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.सरकारकडून भारतातील ६८ पिकांचे शोषण होत आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर भात, दुसºया क्रमांकावर ज्वारी त्यानंतर इतर पिकांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, ऊस पीक उत्पादक शेतकºयांचे आजवर कधीही सरकारकडून शोषण झाले नाही. विद्यमान सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून कृषी क्षेत्रात जाणीवपूर्वक उपद्व्याप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा असुरक्षित व निराधार झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व न्यायाकरिता महाराष्टÑात किसान मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचच्या माध्यमातून सरकारला शेतकºयाच्या हिताचे निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. हे आंदोलन लवकरच होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे नेते व शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी किशोर माथनकर, दत्ता पवार, अतुल गण्यारपवार, जगन्नाथ बोरकुटे आदींनी शेतकºयांच्या दयनिय परिस्थितीवर प्रकाश टाकून विद्यमान भाजपप्रणित सरकार शेतकºयांप्रती सकारात्मक नाही, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, संचालन माजी नगरसेवक विजय गोरडवार यांनी केले. कार्यक्रमाला महेंद्र ब्राह्मणवाडे, विवेक ब्राह्मणवाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.सरकार निगरगट्टचमाजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात भात व इतर कृषी शेतमालात भारत देश आघाडीवर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान मोठ-मोठी आश्वासने दिली. पंतप्रधान झाल्यावर अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्वास आली नाही. शेतकºयांच्या शेतमालाला ५० टक्के नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनही केंद्र सरकारने पाळले नाही. शेतकºयांच्या प्रती एवढे निगरगट्ट सरकार आपण कधीही पाहिले नाही, असे शंकरअण्णा म्हणाले.