शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

धानाचे चुकारे जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी ...

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढली होती. त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची विक्रीसुद्धा केली. परंतु, १ मार्चनंतर विक्री केलेल्या धानाचे चुकारे अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

सोबतच आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची तीन महिन्यांपासून उचल न झाल्याने गोदाम फुल्ल झाले आहे. चालू खरीप हंगामातील खरेदी केलेल्या गोदाममधील धानाची लवकर उचल झाली नाही, तर येणाऱ्या चालू रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी खरेदी-विक्री संस्था गोदाम कुठून उपलब्ध करणार, असा प्रश्नही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदी करण्यास गोदामाअभावी अडचणी येऊ शकतात. याचा फटका रब्बी हंगामातील धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार असून या हंगामातील उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज भरून सोबत सातबारा मूळ प्रत (उन्हाळी धान उल्लेख असलेला), नमुना आठ, बँकेचे पासबुक झेराॕॅक्स प्रत, आधारकार्ड झेराॕॅक्स प्रत ३० एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी-विक्री कार्यालय येथे जमा करण्याच्या सूचना देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेने दिली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांनी सातबारा व इतर कागदपत्रे जमा केली.

सध्या रब्बी हंगामातील धान कापणीयोग्य झाले आहे. मे महिनाअखेरपर्यंत धान पिकाची कापणी व मळणी पूर्ण होणार आहे. असे असले तरी अजूनपर्यंत रब्बी हंगामातील धानाची शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी होणार की नाही, याबाबत शासनाचे पत्र नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. लाॕॅकडाऊन सुरू असल्याने व रब्बीचे धान खरेदीसाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना आपले धान बेभावाने विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, शेतकऱ्यांना धान साठवणूक करण्यासाठी पुरेशी सोय नाही. त्यामुळे अशावेळी मिळेल त्या भावाने धानाची विक्री करावी लागेल. अशी वेळ आल्यास उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येऊ शकतो. याकरिता उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.