शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धानाचे चुकारे जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी ...

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढली होती. त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची विक्रीसुद्धा केली. परंतु, १ मार्चनंतर विक्री केलेल्या धानाचे चुकारे अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

सोबतच आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची तीन महिन्यांपासून उचल न झाल्याने गोदाम फुल्ल झाले आहे. चालू खरीप हंगामातील खरेदी केलेल्या गोदाममधील धानाची लवकर उचल झाली नाही, तर येणाऱ्या चालू रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी खरेदी-विक्री संस्था गोदाम कुठून उपलब्ध करणार, असा प्रश्नही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदी करण्यास गोदामाअभावी अडचणी येऊ शकतात. याचा फटका रब्बी हंगामातील धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार असून या हंगामातील उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज भरून सोबत सातबारा मूळ प्रत (उन्हाळी धान उल्लेख असलेला), नमुना आठ, बँकेचे पासबुक झेराॕॅक्स प्रत, आधारकार्ड झेराॕॅक्स प्रत ३० एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी-विक्री कार्यालय येथे जमा करण्याच्या सूचना देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेने दिली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांनी सातबारा व इतर कागदपत्रे जमा केली.

सध्या रब्बी हंगामातील धान कापणीयोग्य झाले आहे. मे महिनाअखेरपर्यंत धान पिकाची कापणी व मळणी पूर्ण होणार आहे. असे असले तरी अजूनपर्यंत रब्बी हंगामातील धानाची शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी होणार की नाही, याबाबत शासनाचे पत्र नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. लाॕॅकडाऊन सुरू असल्याने व रब्बीचे धान खरेदीसाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना आपले धान बेभावाने विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, शेतकऱ्यांना धान साठवणूक करण्यासाठी पुरेशी सोय नाही. त्यामुळे अशावेळी मिळेल त्या भावाने धानाची विक्री करावी लागेल. अशी वेळ आल्यास उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येऊ शकतो. याकरिता उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.