शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे चुकारे जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी ...

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढली होती. त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची विक्रीसुद्धा केली. परंतु, १ मार्चनंतर विक्री केलेल्या धानाचे चुकारे अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

सोबतच आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची तीन महिन्यांपासून उचल न झाल्याने गोदाम फुल्ल झाले आहे. चालू खरीप हंगामातील खरेदी केलेल्या गोदाममधील धानाची लवकर उचल झाली नाही, तर येणाऱ्या चालू रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी खरेदी-विक्री संस्था गोदाम कुठून उपलब्ध करणार, असा प्रश्नही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदी करण्यास गोदामाअभावी अडचणी येऊ शकतात. याचा फटका रब्बी हंगामातील धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार असून या हंगामातील उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज भरून सोबत सातबारा मूळ प्रत (उन्हाळी धान उल्लेख असलेला), नमुना आठ, बँकेचे पासबुक झेराॕॅक्स प्रत, आधारकार्ड झेराॕॅक्स प्रत ३० एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी-विक्री कार्यालय येथे जमा करण्याच्या सूचना देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेने दिली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांनी सातबारा व इतर कागदपत्रे जमा केली.

सध्या रब्बी हंगामातील धान कापणीयोग्य झाले आहे. मे महिनाअखेरपर्यंत धान पिकाची कापणी व मळणी पूर्ण होणार आहे. असे असले तरी अजूनपर्यंत रब्बी हंगामातील धानाची शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी होणार की नाही, याबाबत शासनाचे पत्र नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. लाॕॅकडाऊन सुरू असल्याने व रब्बीचे धान खरेदीसाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना आपले धान बेभावाने विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, शेतकऱ्यांना धान साठवणूक करण्यासाठी पुरेशी सोय नाही. त्यामुळे अशावेळी मिळेल त्या भावाने धानाची विक्री करावी लागेल. अशी वेळ आल्यास उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येऊ शकतो. याकरिता उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.