शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देउपविभागातील ११ शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी जागर यात्रेचे विदर्भ प्रमुख हरीष हरकडे होते. प्रमुख अतिथी म्हणूम बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, अजय निलदावार, संजय एकापुरे, किसान संघाचे प्रांत मंत्री उदय बोर्रावार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रोडमल गडलोत, विश्व हिंदू परिषदेचे अहेरी जिल्हाध्यक्ष सीताराम सोनानीया, महामंत्री अमित बेझलवार, व्यापारी संघटनेचे कन्हयालाल रोहरा, शंकरजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संजय एकापुरे म्हणाले, शेतकरी बांधवामध्ये कृषीधर्म जागृत करण्यासाठी सदर जागरयात्रा काढण्यात आली असून ही यात्रा अहेरी येथून विदर्भातील अनेक ठिकाणी पोहोचणार आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतात, मात्र आज शेतकºयांची दैनावस्था झाली आहे. शेतात घातक विषारी रसायनाचा वापर अधिक वाढला आहे. कीटकनाशकाच्या अधिक फवारणीमुळे पिकातील जैविक तंत्र बिघडले आहे. गोवंशाचा वापर दूध आणि मांस या साठीच झालेला आहे. शेतकरी या आत्मघातकी धोरणांना बळी पडल्याने आत्महत्या, गोहत्या, दूषित अन्नधान्य सेवनामुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही शेतकरी जागरयात्रा आयोजित करण्यात आली आहे.जैविक शेती कमीत कमी लागतची असून जास्त उत्पन्न देणारी ठरत आहे. तरी याला लागणारे खत व कीटकनाशके हे गोवशांच्या शेण व गोमूत्र यापासून घरच्या घरी तयार करणे सुलभ झाले आहे. विदर्भातील शेतकरी या रसायनमुक्त शेतीचा वापर करावा. गोवशांपासून (पंचगव्या) प्राप्त विविध खत कीटकनियंत्रके, साबण, धूप, अर्क, मंजन, मच्छर अगरबत्ती आदीसह विविध पदार्थ व इतर औषधी तयार करण्यासाठी शेतकºयांनी प्रवृत्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर शेतकरी जागार यात्रेसोबत डिजिटल रथ राहणार असून देवलापार व अकोला जिल्ह्याच्या म्हैसूर येथील आदर्श गो-सेवा केंद्राने सहकार्य केले आहे.यात्रेदरम्यान अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील ११ गरजू शेतकऱ्यांना लकी ड्रा पद्धतीने बैलजोडीचे वाटप करण्यात आले. या यात्रेची सुरुवात पारंपरिक आदीवासी नृत्याने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पूर्वा दोन्तुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे अमित बेझलवार, रवी नेलकुद्री, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार, संतोष अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.वर्धा येथे होणार समारोपविहिपतर्फे विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा निघणार असून अतिदुर्गम अहेरी आणि सिंदखेड राजा येथून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. सदर यात्रा १० दिवसात २ हजार ५५१ किमी चा प्रवास करणार असून २६ जानेवारीला महात्मा गांधी व विनोबा भावे याची कर्मभूमी वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.