शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देउपविभागातील ११ शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी जागर यात्रेचे विदर्भ प्रमुख हरीष हरकडे होते. प्रमुख अतिथी म्हणूम बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, अजय निलदावार, संजय एकापुरे, किसान संघाचे प्रांत मंत्री उदय बोर्रावार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रोडमल गडलोत, विश्व हिंदू परिषदेचे अहेरी जिल्हाध्यक्ष सीताराम सोनानीया, महामंत्री अमित बेझलवार, व्यापारी संघटनेचे कन्हयालाल रोहरा, शंकरजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संजय एकापुरे म्हणाले, शेतकरी बांधवामध्ये कृषीधर्म जागृत करण्यासाठी सदर जागरयात्रा काढण्यात आली असून ही यात्रा अहेरी येथून विदर्भातील अनेक ठिकाणी पोहोचणार आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतात, मात्र आज शेतकºयांची दैनावस्था झाली आहे. शेतात घातक विषारी रसायनाचा वापर अधिक वाढला आहे. कीटकनाशकाच्या अधिक फवारणीमुळे पिकातील जैविक तंत्र बिघडले आहे. गोवंशाचा वापर दूध आणि मांस या साठीच झालेला आहे. शेतकरी या आत्मघातकी धोरणांना बळी पडल्याने आत्महत्या, गोहत्या, दूषित अन्नधान्य सेवनामुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही शेतकरी जागरयात्रा आयोजित करण्यात आली आहे.जैविक शेती कमीत कमी लागतची असून जास्त उत्पन्न देणारी ठरत आहे. तरी याला लागणारे खत व कीटकनाशके हे गोवशांच्या शेण व गोमूत्र यापासून घरच्या घरी तयार करणे सुलभ झाले आहे. विदर्भातील शेतकरी या रसायनमुक्त शेतीचा वापर करावा. गोवशांपासून (पंचगव्या) प्राप्त विविध खत कीटकनियंत्रके, साबण, धूप, अर्क, मंजन, मच्छर अगरबत्ती आदीसह विविध पदार्थ व इतर औषधी तयार करण्यासाठी शेतकºयांनी प्रवृत्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर शेतकरी जागार यात्रेसोबत डिजिटल रथ राहणार असून देवलापार व अकोला जिल्ह्याच्या म्हैसूर येथील आदर्श गो-सेवा केंद्राने सहकार्य केले आहे.यात्रेदरम्यान अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील ११ गरजू शेतकऱ्यांना लकी ड्रा पद्धतीने बैलजोडीचे वाटप करण्यात आले. या यात्रेची सुरुवात पारंपरिक आदीवासी नृत्याने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पूर्वा दोन्तुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे अमित बेझलवार, रवी नेलकुद्री, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार, संतोष अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.वर्धा येथे होणार समारोपविहिपतर्फे विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा निघणार असून अतिदुर्गम अहेरी आणि सिंदखेड राजा येथून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. सदर यात्रा १० दिवसात २ हजार ५५१ किमी चा प्रवास करणार असून २६ जानेवारीला महात्मा गांधी व विनोबा भावे याची कर्मभूमी वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.