शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला

वैरागड : गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र वैरागड परिसरात विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वैरागड परिसरातील ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंपाद्वारे सिंचन करण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी शेतालगत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतावर विद्युत मोटारपंप लावून हलक्या तसेच जडप्रतीच्या धानपिकाला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र या भागामध्ये वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिक गमविण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. रोज दिवसा दुपारी ३ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत वैरागड परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. रात्रीच्या सुमारास विजेचा पुरेसा दाबही नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप निकामी ठरत आहेत. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केले असता, विद्युत पुरवठ्यांमध्ये वरूनच बिघाड आहे. असे उत्तर मिळत आहे. वैरागड येथे विद्युत विभागाचे कार्यालय आहे. मात्र या समस्येकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वैरागड येथे एक नवीन जनित्र उभारण्यात आले. मात्र या जनित्राची विद्युततारांशी जोडणी करण्यात आली नाही. (वार्ताहर)