शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेती सिंचनाची सुविधा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:59 IST

दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : कर्जमाफी योजनेअंतर्गत २४ शेतकºयांना प्रमाणपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. शेतकºयांना दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागू नये, त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतकºयांना समृद्ध करणार, असे प्रतिपादन आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील २४ शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, प्रभारी जिल्हाधिकारी सुरेश चौधरी, सहायक जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपनिबंधक माधुरी पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रक्रिया साडेतीन महिन्यात पूर्ण झाली. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी करून त्यांची दिवाळी गोड केली, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यावेळी म्हणाले. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे व शेतकºयांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बँकांचे कर्ज फेडण्यास शेतकºयांना अडचणी येतात. नव्याने कर्ज घेणे शेतकºयांना कठीण होते. अनेक वर्ष शेतकरी कर्जाच्या ओझ्यात राहतो. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीवर मात करण्यासाठी कर्जमाफीचे नियोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकºयांची कर्जमाफी करण्यात येईल, असे सांगितले होते.त्याअनुषंगाने सर्व आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा राज्यस्तरावरील शुभारंभ मुंबईत पार पडला. आता पालकमंत्री या नात्याने आपण कर्जमाफीबाबतचे तसेच कर्ज भरलेल्यांना प्रोत्साहनपर लाभ प्रमाणपत्राचे वितरण करीत आहे, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. कर्जमाफी योजनेची कार्यवाही गतीने केल्याबाबत पालकमंत्री ना. आत्राम यांनी जिल्हा प्रशासन, सहकार विभागाचे उपनिबंधक, राष्टÑीयकृत बँकेच्या अधिकाºयांचे यावेळी कौतुक केले. कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी चौधरी, जि. प. अध्यक्ष भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, नगराध्यक्ष पिपरे आदींनी कर्जमाफीबाबत मनोदय व्यक्त करीत शेतकºयांनी ज्या कामासाठी कर्ज घेतले आहेत, त्याच कामासाठी वापर करून ते कर्ज परत करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक उपनिबंधक माधुरी पांडे, संचालन सहायक निबंधक पाटील यांनी केले.