शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

धान उत्पादनात प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:18 IST

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपिकांवर रोगांचा परिणाम : गुड्डीगुडम परिसरातील शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले. धान पेरणीपासून रोवणी व देखभालीचा खर्च, कीटकनाशके व औषधांचा खर्च बघता यंदा शेती तोट्यातच राहिली. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.मागील चार-पाच वर्षांपासून गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने धानाचे उत्पादन घटत आले आहे. यंदाही विविध रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने शेतकऱ्यांनी तीन ते चारवेळा कीटकनाशकांची फवारणी केली. तरीसुद्धा रोग नाहीसा झाला नाही. धान पीक निसवा होण्याच्या स्थितीत असताना मावा, तुडतुडा, खोडकिडा, करपा, कडाकरपा, बेरड आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर दिवाळी उत्सवात परतीच्या पावसाने हलक्या धान पिकाचे प्रचंड नुकसान केले. मध्यम व जड प्रतीचे धान पीक जोमात असतानाच रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे धान पीक नष्ट झाले. गुड्डीगुडम परिसरात मागील वर्षी प्रति एकरी प्रति पोत्यात ७० किलो प्रमाणे २८ ते ३० पोते धानाचे उत्पादन झाले होते. परंतु यंदा केवळ ८ ते १० पोते धानाचे उत्पादन झाले आहे. दरवर्षी अपुऱ्या पावसामुळे धानाचे उत्पादन घटत होते. परंतु यंदा समाधानकारक पाऊस येऊनसुद्धा धानाच्या उत्पादनात वाढ झाली नाही. उलट धान पीक मोठ्या प्रमाणावर घटले.धान पिकाच्या पूर्व मशागतीसह धान रोवणी, कापणी, बांधणी, मळणी यासह मजूर, ट्रॅक्टरचा खर्च आदी खर्च वगळल्यास शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. गुड्डीगुडम परिसरात नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणही करण्यात आले. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही. यंदा परिसरात ५० टक्के तर काही भागात ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.