शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

विस्तार अधिकाऱ्यांची ग्रा. पं.ला संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

गडचिरोली जिल्ह्यामध्ये काेराेनाचे बरेच रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे कोरची येथील काेविड केअर केंद्र पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याठिकाणी ...

गडचिरोली जिल्ह्यामध्ये काेराेनाचे बरेच रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे कोरची येथील काेविड केअर केंद्र पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याठिकाणी कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यास जागा कमी पडत आहे. तसेच कोरची तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण जास्त असून, त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे गावात फिरताना दिसून येतात, त्यामुळे इतर व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह होत आहेत. यास प्रतिबंध करणे आणि गावातील प्राथमिक शाळा, खासगी विद्यालय, आश्रमशाळा व मंडळ कार्यालयाची साफसफाई करण्यात यावी तसेच पिण्याच्या पाण्याची व विजेची व्यवस्था करून त्याठिकाणी होम आयसोलेशनमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात यावे तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरूनच करण्यात यावी, त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण गावात कोणीही भेटणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

गृह विलगीकरणात असलेल्या गंभीर रुग्णाची माहिती आशा वर्करकडून घेतल्यानंतर त्या गंभीर रुग्णाची तालुक्यातील कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) मध्ये भरती करण्याची जबाबदारी त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची राहणार असून, या सूचनांचे पालन न केल्यास व त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित त्या त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हे प्रशासकीय कारवाईस पात्र राहणार आहेत.

यासाठी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिवार्द यांच्या आदेशानुसार कोरची पंचायत समिती गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी आदेशपत्र काढून कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीला संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांसह १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.

बाॅक्स ..

अर्लट राहावे लागणार

संपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या २९ ग्रामपंचायतींना दररोज भेटी देऊन त्यांची फोटो (नोट कॅम्प) मध्ये व उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे (आरटीपीसीआर) व अँटिजेन टेस्ट करण्यासाठी लोकांना उपस्थित ठेवणे याबाबत नियोजन करणे तसेच स्वतः उपस्थित राहणे आहे व नोट कॅम्पचे फोटो दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वरिष्ठ सहायक पुसदकर यांच्या व्हाॅट्सॲप नंबरवर पाठविणे आहे. या कामांमध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.