शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: June 7, 2015 01:59 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

किसन नागदेवे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे जनकल्याण पर्व कार्यक्रमदेसाईगंज : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले आहे.देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी जनकल्याण पर्व व महासंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नाना नाकाडे, चांगदेव फाये, नगराध्यक्ष श्याम उईके, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, आशा राऊत, शांताबाई तितीरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी ग्राम पंचायत निवडणुकीत विजय संपाद करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना किसन नागदेवे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्य मार्गाचे अनेक काम प्रस्तावित केले आहेत. युरिया खतावरील दरवाढ कपात केल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर आहे. घरकूल योजना, जन-धन योजना, बेटी सुरक्षा योजना अशा अनेक योजना कार्यान्वित करून जनतेला विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. जनतेने भाजपावर विश्वास ठेवत केंद्रात व राज्यातील सत्ता हाती दिली आहे. या विश्वाला तडा जाऊ न देता सरकारने अनेक विकासात्मक काम केले आहे. हे सर्व कामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे काम असल्याचे प्रतिपादन केले. संचालन राजरतन मेश्राम यांनी केले.