शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

विकासकामांची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देखासदारांचे कार्यकर्त्यांना आवाहन : गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात भाजप पक्षाची बैठक रविवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरीगेला, डॉ. भारत खटी, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, भांडेकर, समर्थ, जनार्धन साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली तालुक्यातील भाजप पक्ष संघटनेचा प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रशासनाच्या वतीने सध्या नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकांना सहकार्य करावे. नावाची नोंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होईल, असे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी जनधन विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान व इतर अनेक योजना राबविण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानातून संपूर्ण भारतात ७.५ कोटी इतक्या शौचालयाचे बांधकाम केले. उज्वला योजनेमुळे ३.८ कोटी कुटुंब धूरमुक्त झाली, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.कार्यकर्ता महत्त्वाचा दुवाआगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपने सक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख, पालक व बुथ प्रमुख या सर्वांवर जबाबदारी टाकली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा दुवा असल्याने कार्यकर्त्यांनी बुथावर लक्ष केंद्रीत करून त्याअनुषंगाने पक्ष संघटनेचे काम केले पाहिजे, असे आवाहन बाबुराव कोहळे यांनी या बैठकीत भाषणातून केले.