शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

विकासकामांची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देखासदारांचे कार्यकर्त्यांना आवाहन : गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात भाजप पक्षाची बैठक रविवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरीगेला, डॉ. भारत खटी, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, भांडेकर, समर्थ, जनार्धन साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली तालुक्यातील भाजप पक्ष संघटनेचा प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रशासनाच्या वतीने सध्या नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकांना सहकार्य करावे. नावाची नोंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होईल, असे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी जनधन विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान व इतर अनेक योजना राबविण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानातून संपूर्ण भारतात ७.५ कोटी इतक्या शौचालयाचे बांधकाम केले. उज्वला योजनेमुळे ३.८ कोटी कुटुंब धूरमुक्त झाली, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.कार्यकर्ता महत्त्वाचा दुवाआगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपने सक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख, पालक व बुथ प्रमुख या सर्वांवर जबाबदारी टाकली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा दुवा असल्याने कार्यकर्त्यांनी बुथावर लक्ष केंद्रीत करून त्याअनुषंगाने पक्ष संघटनेचे काम केले पाहिजे, असे आवाहन बाबुराव कोहळे यांनी या बैठकीत भाषणातून केले.