शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

तंटेखोरांची तंमुसमधून होणार हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:44 IST

गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे,

गुन्ह्यांचीही तपासणी : सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार देसाईगंज : गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे, या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. मोहिमेच्या अंलबजावणीसाठी गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समितीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांची अध्यक्ष, सदस्यपदी निवड झाल्यास मोहीम अपयशी ठरू शकते, हे टाळण्यासाठी शासनाने कडक पाऊल उचलले असून तंटाखोर प्रवृत्तीच्या अध्यक्ष व सदस्यांची समितीतून हकालपट्टी केली जाणार आहे. वैैयक्तिक वादामुळे गावाचा विकास खुंटतो शिवाय गावात नेहमीच तणावाचे वातावरण राहते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गाव पातळीवर तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत प्रतिष्ठित, समजूतदार, सामाजिक जाण असलेले चारित्र्यवान, निर्व्यसनी असलेल्या व्यक्तींचा समावेश केला जातो. समितीच्या पदांपासून गुंड प्रवृत्ती, अवैध व्यवसाय करणारा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दूर ठेवण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु मागील काही वर्षांत अनेक गावांच्या तंटामुक्त समित्यांवर तंटेखोर व्यक्ती विराजमान आहेत. अशा लोकांमुळे मोहीम यशस्वी होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. परंतु शासनाने आता कठोर पावले उचलली असून समितीचे अध्यक्ष तथा सदस्यांची निवड करतानाच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) पूर्वीच्याही पदाधिकाऱ्यांची चौकशी तंटामुक्त समितीमध्ये पूर्वी नियुक्ती करण्यात आलेल्या अध्यक्ष, सदस्यांवर गुन्हे दाखल असतील तर अशांचीही तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तंमुसमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तंटामुक्त समित्यांमध्ये गावातील प्रभावशाली लोकांची नियुक्ती केली जाते. परंतु नियुक्त केले अनेक पदाधिकारी स्वच्छ प्रतिमेचे असतीलच असे नाही, गाव पातळीवर ग्रामसभेत सदर लोकांची नियुक्ती लोकांच्या बहुमताने होत असताना अनेकदा सदर नियुक्तीचे चारित्र्य तपासले जात नाही. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचीही नियुक्ती तंटामुक्त समितीत केली जाते. अनेकदा एक वर्ष तर काहीवेळा सलग तीन ते चारवेळा असे व्यक्ती पदावर राहिल्याने तंमुस मोहिमेत अडचणी निर्माण होतात.