शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

तंटेखोरांची तंमुसमधून होणार हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:44 IST

गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे,

गुन्ह्यांचीही तपासणी : सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार देसाईगंज : गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे, या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. मोहिमेच्या अंलबजावणीसाठी गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समितीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांची अध्यक्ष, सदस्यपदी निवड झाल्यास मोहीम अपयशी ठरू शकते, हे टाळण्यासाठी शासनाने कडक पाऊल उचलले असून तंटाखोर प्रवृत्तीच्या अध्यक्ष व सदस्यांची समितीतून हकालपट्टी केली जाणार आहे. वैैयक्तिक वादामुळे गावाचा विकास खुंटतो शिवाय गावात नेहमीच तणावाचे वातावरण राहते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गाव पातळीवर तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत प्रतिष्ठित, समजूतदार, सामाजिक जाण असलेले चारित्र्यवान, निर्व्यसनी असलेल्या व्यक्तींचा समावेश केला जातो. समितीच्या पदांपासून गुंड प्रवृत्ती, अवैध व्यवसाय करणारा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दूर ठेवण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु मागील काही वर्षांत अनेक गावांच्या तंटामुक्त समित्यांवर तंटेखोर व्यक्ती विराजमान आहेत. अशा लोकांमुळे मोहीम यशस्वी होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. परंतु शासनाने आता कठोर पावले उचलली असून समितीचे अध्यक्ष तथा सदस्यांची निवड करतानाच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) पूर्वीच्याही पदाधिकाऱ्यांची चौकशी तंटामुक्त समितीमध्ये पूर्वी नियुक्ती करण्यात आलेल्या अध्यक्ष, सदस्यांवर गुन्हे दाखल असतील तर अशांचीही तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तंमुसमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तंटामुक्त समित्यांमध्ये गावातील प्रभावशाली लोकांची नियुक्ती केली जाते. परंतु नियुक्त केले अनेक पदाधिकारी स्वच्छ प्रतिमेचे असतीलच असे नाही, गाव पातळीवर ग्रामसभेत सदर लोकांची नियुक्ती लोकांच्या बहुमताने होत असताना अनेकदा सदर नियुक्तीचे चारित्र्य तपासले जात नाही. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचीही नियुक्ती तंटामुक्त समितीत केली जाते. अनेकदा एक वर्ष तर काहीवेळा सलग तीन ते चारवेळा असे व्यक्ती पदावर राहिल्याने तंमुस मोहिमेत अडचणी निर्माण होतात.