शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेसचा थांबा रद्द होणार

By admin | Updated: June 15, 2014 23:33 IST

स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा असलेली बिलासपूर-चेन्नई ही एक्सप्रेस रेल्वे गाडी जुलै महिन्यापासून शहरातील रेल्वे स्थानकावर थांबणार नाही़ रेल्वे प्रशासनाव्दारे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होणार

देसाईगंज : स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा असलेली बिलासपूर-चेन्नई ही एक्सप्रेस रेल्वे गाडी जुलै महिन्यापासून शहरातील रेल्वे स्थानकावर थांबणार नाही़ रेल्वे प्रशासनाव्दारे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होणार असल्याने शहरवासीयांना धक्का बसला आहे़ नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी थांबा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी रेल्वे प्रशांकडून केली जात आहे.देसाईगंज हे औद्योगिक शहर असून परिसरातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही नागरिक दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास सर्वप्रथम देसाईगंज येथूनच पुढील प्रवासाला सुरूवात करतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी राहते. त्यामुळे देसााईगंज येथे बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेसचा थांबा देण्याची मागणी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांकडून करण्यात आली होती. प्रवाशांच्या मागणीनुसार व अथक प्रयत्नाने या मार्गावरून धावणाऱ्या बिलासपूर- चेन्नई रेल्वे गाडीला देसाईगंज येथे थांबा देण्यात आला होता. आठवड्यातून ही रेल्वे रविवारला बिलासपूरकडे जाते तर मंगळवारला चेन्नईकडे जाते़ मात्र येत्या १ जुलैपासून चेन्नईला जाणाऱ्या व २७ जुलैपासून बिलासपूरला जाणाऱ्या रेल्वेचा शहरातील थांबा बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होत आहे. दरवर्षी जून, जुलै महिन्यात या एक्सप्रेस गाडीचा थांबा रेल्वे पोर्टलवरून उडत असल्याचे देखील रेल्वेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले़ त्यामुळे या एक्सप्रेस गाडीचा कायमचा तोडगा निघने आवश्यक आहे. गोंदिया-बल्लारपूर या दोन्ही जन्शनच्या मध्यवर्ती ठिकाणी वडसा रेल्वे स्टेशन असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेस गाडीचा थांबा शहरात पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. देसाईगंज येथून जाणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेसला थांबा देसाईगंज येथे असावा, अशी येथील नागरिकांची आग्रही भूमिका आहे. इतर सर्व रेल्वे गाड्यांना प्रवाशी मिळत असतांना बिलापूर व चेन्नई याच रेल्वेगाडीला देसाईगंज येथून प्रवासी मिळत नसल्याचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी काढलेला अंदाज चुकीचा आहे. जुलै व जून महिन्यात रेल्वे प्रवाशांची संख्या थोडी कमी होत असेल. एवढे मान्य केले तरीही एवढ्या कारणासाठी रेल्वे थांबाच रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, अशी टीका सामान्य नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर केली जात आहे. मिटींगनंतरच्या निर्णयाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. बिलासपूर- चेन्नई एक्सप्रेसचा थांबा रद्द झाल्यास प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)