शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देशातील मोठ्या शहरांच्या विकासासाठी गावांचे शोषण

By admin | Updated: January 18, 2017 01:39 IST

अर्थ व्यवस्थेतील मोठा निधी शहर विकासासाठी खर्च केला जातो. यामुळे गावांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

 कुरखेडात व्याख्यान : विजय जावंधिया यांचे प्रतिपादन कुरखेडा : अर्थ व्यवस्थेतील मोठा निधी शहर विकासासाठी खर्च केला जातो. यामुळे गावांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी गाव व शहर यांच्यातील आर्थिक अंतर वाढत चालले असून भविष्यातील ही धोक्याची नांदी असल्याचा इशारा महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते व विचारवंत विजय जावंधिया यांनी दिला. येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयातील भाऊराव कढव स्मृती सभागृहात समाज विज्ञान अभ्यास मंडळाद्वारे मंगळवारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या या विषयावर विजय जावंधीया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, डॉ. दशरथ आदे, डॉ. रवींद्र विखार, प्रा. संजय महाजन, डॉ. ते. ना. बुध्दे शेतकरी नेते राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू खुणे, पंढरी नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय जावंधिया म्हणाले, काल मार्क्सने सांगितले होते की, भांडवलदार श्रमाच्या मुठीतून भांडवल तयार करतात. मात्र वर्तमान स्थितीत भारतात संघटीत भांडवलदार व संघटीतश्रम हे हातात हात घालून असंघटीत भांडवलदार, शेती, असंघटीत शेतमजूर यांचे शोषण करीत आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक, सामाजिक समानता असलेला समाज निर्माण करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न शेतीचा वाटा सुमारे ४८ टक्के होता. तो आता १२ ते १४ टक्क्यांवर आला आहे. सेवा क्षेत्राचा वाटा सुमारे ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई वाढली की, सेवादारांना वेतनवाढ मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला त्या प्रमाणात भाव मिळत नाही. या तफावतीमुळे उत्पादनात वाढ होऊनही शेती तोट्यात आहे. तोट्याच्या शेती व्यवसायामुळे गावात दारिद्र्य आहे. मात्र गरीबीमागचे खरे कारण गावात नसून असंतुलीत अर्थव्यवस्थेत आहे, असे जावंधिया म्हणाले. डॉ. गोगुलवार यांनी मार्गदर्शन करताना मूठभर लोकांकडे जगातील अर्धे अधिक संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. आर्थिक विषमता दूर होऊन संपत्तीचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार प्रा. खोपे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)