शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

देशातील मोठ्या शहरांच्या विकासासाठी गावांचे शोषण

By admin | Updated: January 18, 2017 01:39 IST

अर्थ व्यवस्थेतील मोठा निधी शहर विकासासाठी खर्च केला जातो. यामुळे गावांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

 कुरखेडात व्याख्यान : विजय जावंधिया यांचे प्रतिपादन कुरखेडा : अर्थ व्यवस्थेतील मोठा निधी शहर विकासासाठी खर्च केला जातो. यामुळे गावांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी गाव व शहर यांच्यातील आर्थिक अंतर वाढत चालले असून भविष्यातील ही धोक्याची नांदी असल्याचा इशारा महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते व विचारवंत विजय जावंधिया यांनी दिला. येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयातील भाऊराव कढव स्मृती सभागृहात समाज विज्ञान अभ्यास मंडळाद्वारे मंगळवारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या या विषयावर विजय जावंधीया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, डॉ. दशरथ आदे, डॉ. रवींद्र विखार, प्रा. संजय महाजन, डॉ. ते. ना. बुध्दे शेतकरी नेते राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू खुणे, पंढरी नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय जावंधिया म्हणाले, काल मार्क्सने सांगितले होते की, भांडवलदार श्रमाच्या मुठीतून भांडवल तयार करतात. मात्र वर्तमान स्थितीत भारतात संघटीत भांडवलदार व संघटीतश्रम हे हातात हात घालून असंघटीत भांडवलदार, शेती, असंघटीत शेतमजूर यांचे शोषण करीत आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक, सामाजिक समानता असलेला समाज निर्माण करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न शेतीचा वाटा सुमारे ४८ टक्के होता. तो आता १२ ते १४ टक्क्यांवर आला आहे. सेवा क्षेत्राचा वाटा सुमारे ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई वाढली की, सेवादारांना वेतनवाढ मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला त्या प्रमाणात भाव मिळत नाही. या तफावतीमुळे उत्पादनात वाढ होऊनही शेती तोट्यात आहे. तोट्याच्या शेती व्यवसायामुळे गावात दारिद्र्य आहे. मात्र गरीबीमागचे खरे कारण गावात नसून असंतुलीत अर्थव्यवस्थेत आहे, असे जावंधिया म्हणाले. डॉ. गोगुलवार यांनी मार्गदर्शन करताना मूठभर लोकांकडे जगातील अर्धे अधिक संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. आर्थिक विषमता दूर होऊन संपत्तीचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार प्रा. खोपे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)