शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

जिल्हा विकासावर सव्वा दोन हजार कोटींचा खर्च

By admin | Updated: May 14, 2016 01:11 IST

शासनाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, रस्ते, पूल, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम,....

प्रशासन व योजनांवर खर्च : २०५ कोटी अधिकचा निधीदिगांबर जवादे  गडचिरोलीशासनाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, रस्ते, पूल, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, लोकोपयोगी कामे व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावर २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यावर २ हजार २२१ कोटी १९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे आल्यापासून राज्य शासनाच्या वतीने जनतेच्या हितार्थ शेकडो योजना राबविल्या जातात. काही योजनांची अंमलबजावणी शासन स्वत: करते. तर काही योजनांची अंमलबजावणी नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फतीने केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांची उत्पन्नाची साधने अत्यंत मर्यादित असल्याने या योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या वतीने हजारो कर्मचारी व अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे वेतनही जिल्हा खर्चाचाच बाब आहे. राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी सर्व प्रथम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात येतो. त्यानंतर संबंधित विभाग प्रमुख तो पैसा काढून घेतात. त्यामुळे जिल्हा खर्चाचा एकत्रित हिशोब जिल्हा कोषागार कार्यालयात ठेवला जातो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात जिल्हा विकासावर व प्रशासकीय बाबींवर सुमारे २ हजार २२१ कोटी ९१ लाख रूपये खर्च झाले आहेत. मागील २०१४-१५ या वर्षात जिल्ह्याचा खर्च २ हजार १६ कोटी ६१ लाख रूपये होता. २०१४-१५ च्या तुलनेत २०१५-१६ चा खर्च २०५ कोटी रूपयांनी अधिक आहे. जिल्हा प्रशासनावर ११५ कोटी खर्चजिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाच्या शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो कर्मचारी आहेत. त्याचबरोबर जिल्हाभरातही हजारो कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांचे वेतन, भत्ते, काही इमारतींचा खर्च यावर सुमारे ११५ कोटी ३३ लाख रूपये खर्च झाले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनावर सर्वाधिक ३६४ कोटी २७ लाख रूपये खर्च झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे. नक्षलवाद नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून शेकडो कोटी रूपये खर्च केले जात आहेत. शेकडो कोटी अखर्चितशासनाकडून प्राप्त झालेला निधी संबंधित विभाग जिल्हा कोषागार कार्यालयातून काढून घेते. सदर निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. मात्र बहुतांश विभाग प्राप्त झालेला निधी खर्चत नाही. २० ते ३० टक्के निधी अखर्चीत राहतो. मात्र सदर निधी जिल्हा कोषागार कार्यालयातून काढला जात असल्याने तो खर्चीत समजल्या जाते.दिवसेंदिवस योजनांपेक्षा प्रशासनावरील खर्च वाढत चालला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. योजनांसाठी पुरेशा प्रमाणात निधीच उपलब्ध होत नाही.