शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, नाली स्वच्छतेवर चार लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:35 IST

आॅनलाईन लोकमतवैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख २६ हजार ८२२ रूपयांचा खर्च केला असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र गावात स्वच्छतेचे कुठलेही काम झाले ...

ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : सफाई कामात गैरव्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप; चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतवैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख २६ हजार ८२२ रूपयांचा खर्च केला असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र गावात स्वच्छतेचे कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे रस्ते, गटार स्वच्छतेच्या कामात ग्रामपंचायतीने आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप नागरिकांनी मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरली.एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीतील सर्व निधीचा जमा खर्च ५ डिसेंबरच्या ग्रामसभेत सादर करण्यात आला. या अर्धवार्षिक जमाखर्चात रस्ते, गटार, साफसफाईच्या कामावर १ लाख ५७ हजार ३२२ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच नालीतील गाळ फेकण्याच्या कामावर २ लाख १९ हजार ५०० रूपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे. त्यातही गाळ फेकणाºया ट्रॅक्टर मालकाचे पुन्हा ५० हजार रूपयांचे देयक अदा करणे शिल्लक असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले. यावर गावकºयांनी तीव्र आक्षेप घेऊन वैरागड व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया पाटनवाडा, मेंढेबोडी या गावातील अनेक नाल्या तुंबल्या असताना रस्ते व नाली सफाईवर सहा महिन्यात सव्वाचार लाखांचा खर्च कसा झाला, असा सवाल ग्रामस्थानी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना केला. सदर खर्च हा ग्रामसभेत नामंजूर करून या प्रकरणाची चौैकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली.एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या सहा महिन्यांत नाल्यातील गाळ उपसणे आणि तो ट्रॅक्टरद्वारे बाहेर फेकण्याच्या कामावर २ लाख ७० हजार रूपयांचा खर्च दाखविण्यात आला. गाळ फेकण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाली तर हा गाळ नेमका कोठे फेकण्यात आला? याबाबत डम्पिंग ग्राऊंड नेमके कुठे आहे, ते दाखवा, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. मात्र नागरिकांना या ग्रामसभेत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. रस्ते व नाली सफाईच्या कामात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाला असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. यावेळी वैरागड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाणी प्रश्नावर गदारोळवैरागडच्या ग्रामसभेत पाणी प्रश्नावर प्रचंड गदारोळ झाला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तीन ते चार दिवसाआड नळाला पाणी येतो, नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही. नळाला टिल्लूपंप लावणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नागरिकांनी सरपंच व उपसरपंचाला कोंडीत पकडले.टीव्ही संच खरेदीच्या मुद्यावर चर्चाशाळा डिजिटल करण्यासाठी शाळांना टीव्ही संच खरेदी न करण्याचे मासिक सभेत ठरले होते. मात्र ग्रा.पं. ने १ लाख २९ हजार रूपयांतून टीव्ही संच खरेदी करून शाळांना पुरविले. या मुद्यावरही चर्चा झाली.