शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

आदिवासींवर कोट्यवधींचा खर्च

By admin | Updated: May 22, 2014 01:08 IST

आदिवासींच्या विकासासाठी शासन शेकडो योजना राबवित आहे.

गडचिरोली : आदिवासींच्या विकासासाठी शासन शेकडो योजना राबवित आहे. गडचिरोली जिल्ह्यात २0१३-१४ या आर्थिक वर्षात आदिवासी उपयोजनांवर १९८ कोटी २३ लाख ९८ हजार रूपये खर्च करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या ५0 टक्केच्या जवळपास आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो योजना राबविल्या जातात. एवढेच नाही तर केंद्र व राज्यात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या मार्फतीने योजनांची अंमलबजावणी केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने या जिल्ह्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्या जातो.

आदिवासी समाजातील बहुतांश नागरिक शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. पैशाअभावी शेतीमध्ये आधुनिक साधणांचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतीतून अत्यंत कमी उत्पन्न प्राप्त होते. कधीकधी खर्चही भरून निघणे शक्य होत नाही. या शेतकर्‍यांना शेती कसण्यासाठी आईल इंजिन, मोटार पंप, पॉवर ट्रिलर, पाईप, लोखंडी नांगर आदी साधणे विविध विभागांच्या मार्फतीने उपलब्ध करून दिले जातात. २0१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये कृषी व कृषी संलग्न सेवांवर तब्बल १५ कोटी २0 लाख २५ हजार रूपये खर्च करण्यात आला. आदिवासी समाजाची बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. आदिवासी समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्या ठिकाणी हातपंप खोदणे, विहीर बांधणे, रस्त्यांची निर्मिती करणे किंवा रस्ता दुरूस्त करणे आदींसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर आदिवासी लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यावर ६ कोटी ५८ लाख ८८ हजार रूपये खर्च झाला आहे. आदिवासी शेतकर्‍यांना कुप नलिका, हिरीर खोदून देऊन सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर पुराचा फटका बसू नये यासाठी आदिवासी गावापर्यंत जाणार्‍या मार्गावरील पुलाचे बांधकाम करणे, रस्ता दुरूस्त करणे, आपातकालीन स्थितीत मदत करणे यावर १0 कोटी ६४ लाख ७२ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे.

आदिवासी बहुल गावांमध्ये वीज पोहचलेली नाही. गावाची लोकसंख्या कमी असल्याने विजेचे खांब सदर गावापर्यंत पोहचविणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही, असे उत्तर वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले. आदिवासी विकास विभागाने वीज वितरण कंपनीला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर गावापर्यंत खांब टाकून वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या घरी विद्युत जोडणी करण्यासाठीसुद्धा अनुदान देण्यात आले आहे. यावर वर्षाकाठी ७ कोटी रूपयाचे अनुदान देण्यात आले आहे. वाहतूक व दळणवळणासाठी ३१ कोटी ७९ लाख ७ हजार रूपये, सामान्य आर्थिक सेवांवर २५ लाख तर सामाजिक व सामूहिक सेवांवर १२६ कोटी ७३ लाख ३ हजार रूपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. २0१३-१४ मध्ये आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी उपयोजनांच्या माध्यमातून १९८ कोटी २३ लाख ९८ हजार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)