शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अपेक्षा 35 कोटींची, हाती आले 7 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

जिल्ह्यात यावर्षी जेमतेम २५ रेतीघाटांच्या लिलावाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली. उपलब्ध रेतीसाठ्यानुसार त्या घाटांची एकूण किंमत ३५ कोटीच्या घरात ठेवण्यात आली. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पहिला लिलाव झाला. पण त्यात गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा भागातील मिळून केवळ १० रेतीघाटांसाठी ऑनलाईन बोली लागली. वास्तविक हे सर्व घाट तुलनेने छोटे आहेत.

ठळक मुद्देरेतीघाटांच्या लिलावात यावर्षी प्रशासन तोट्यात, तीन वेळा लिलाव होऊनही प्रतिसाद नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या धोरणानुसार आणि पर्यावरण विभागाच्या विविध अटींच्या अधीन राहून यावर्षी राबविली जात असलेली रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया प्रशासनासाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. तीन वेळा लिलाव प्रक्रिया होऊनही केवळ पहिल्या लिलावाला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. दुसऱ्या आणि तिसऱ्या लिलावासाठी कोणी निविदाच भरल्या नसल्यामुळे आता त्या घाटांची किंमत कमी करून पुन्हा लिलाव प्रक्रिया करावी लागणार आहे.जिल्ह्यात यावर्षी जेमतेम २५ रेतीघाटांच्या लिलावाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली. उपलब्ध रेतीसाठ्यानुसार त्या घाटांची एकूण किंमत ३५ कोटीच्या घरात ठेवण्यात आली. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पहिला लिलाव झाला. पण त्यात गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा भागातील मिळून केवळ १० रेतीघाटांसाठी ऑनलाईन बोली लागली. वास्तविक हे सर्व घाट तुलनेने छोटे आहेत. त्यांना प्रशासनाने निश्चित केलेल्या रेतीघाटांच्या किमतीपेक्षा दिड कोटीहून जास्त किंमत मिळाली असली तरी त्यातून जेमतेम ७ कोटींचा महसूल मिळाला आहे. तुलनेने मोठ्या असलेल्या उर्वरित १५ रेतीघाटांसाठी पुन्हा दोन वेळा लिलाव झाला. पण त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. नियमानुसार तीन लिलाव झाल्यामुळे आता त्या घाटांची किंमत कमी करून पुन्हा लिलाव करावा लागणार आहे.

तीन वर्ष राहणार हक्कराज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदाच तीन वर्षासाठी हे लिलाव झाले आहेत. त्यामुळे २०२२-२३ पर्यंत संबंधितांचा त्यावर अधिकार राहणार आहे. मात्र त्यांना दरवर्षी त्याचा मोबदला शासनाकडे भरावा लागेल.

तेलंगणातील लिलावाचा परिणाम?निविदा न आलेल्या १५ रेतीघाटांमध्ये अनेक मोठ्या घाटांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या मुकडीगटा रै., मद्दीकुंटा, रेगुंठामाल, अंकिसामाल, चिंतरवेला आणि आरडा आदी घाटांचा समावेश आहे. या घाटांची किंमत प्रत्येकी २.४७ कोटी ते ३.७१ कोटी आहे. यावर्षी तेलंगणा राज्यातील अनेक रेतीघाट आधीच सुरू करण्यात आल्यामुळे त्या भागातील रेतीघाटांच्या लिलावास यावर्षी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. यासोबतच कुरखेडा तालुक्यातील सती नदी, चामोर्शी तालुक्यातील पोहार आणि कठाणी नदीवरील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नाही.

 

टॅग्स :sandवाळू