शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

विद्यमान सरकार लबाड व ढोंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:56 IST

लबाड व ढोंगी शासनाचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

ठळक मुद्देनाना पटोले : मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : लबाड व ढोंगी शासनाचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संविधान बचाव मोहिमेतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नव्याने सुरूवात करणार आहे. राज्यासह केंद्रातही काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी व काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला सारून कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.राजीव गांधी कला, वाणिज्य महाविद्यालय व डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज तथा तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य मेळावा तथा सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, महासचिव जिया पटेल, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी नगराध्यक्ष जेसामल मोटवानी, प्रकाश ईटनकर, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, अ‍ॅड.संजय गुरू, योगराज कुथे, ईश्वर कुमरे, सगुना तलांडी, डॉ.प्रमोद साळवे, नगरसेवक हरीश मोटवानी, परसराम टिकले, किशोर वनमाळी आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.यावेळी पटोले म्हणाले, सत्तेत येण्यासाठी आश्वासनांच्या खैराती वाटून सर्वसामान्यांना बरबादीच्या उंबरठ्यावर उभे करणारे भाजप शासन म्हणजे लबाडाचे आवतन देणारे शासन आहे. शेतकरी शेतमजुरांना अनेक प्रलोभने दाखवून कोट्यवधी रुपये बँॅकात जमा करायला भाग पाडले. पण सत्तेत येताच काळा पैसा, प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन विसरून गेले. बहुजनांची मुले उच्चशिक्षित होऊ नयेत यासाठी शासकीय स्तरावरून देण्यात येणारी स्कॉलरशिपही बंद केल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीत नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार पटकावणारे किशोर मेश्राम यांना नाना पटोले यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी नर्सिंग कॉलेजच्या वतीने आरोग्य मेळाव्यात एकूण १३८ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. संचालक नेहा तिवारी, प्रास्तविक डॉ. प्रमोद साळवे तर आभार प्रा.अविनाश शिवणकर यांनी मानले.