शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे कार्यालयात आनंदी वातावरण राहत होते.

ठळक मुद्देचर्चा फिस्कटली : उपवनसंरक्षक अपमानास्पद वागणूक?

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : येथील उपवन संरक्षक चंद्रकांत तांबे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करून आलापल्ली वन उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलन बुधवारी सुध्दा कायम राहणार आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातील इतरही वन कर्मचाऱ्यांनी समर्थन दर्शविले आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने अधिकाऱ्यांवरील दबाव वाढला आहे.आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे कार्यालयात आनंदी वातावरण राहत होते. परिणामी प्रशासकीय कामे वेळेवर व उत्तमरित्या होत होती. आपणास भारतीय वनसेवेचा अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर मात्र आपल्या स्वभावात फार मोठा बदल पडला आहे. कार्यालयातील कक्ष प्रमुखांसह इतर कर्मचाऱ्यांनाही आपणाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचारी त्रस्त झाले आहेत. स्वभावात बदल करावा, असा सल्ला तांबे यांना निवेदनातून देण्यात आला.निवेदन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र चर्चेतून सकारात्मक उत्तर निघू शकले नाही. त्यामुळे ३ वाजतानंतर उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सामुहिक सुटीचा अर्ज टाकला.त्यामुळे दुपारनंतर संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. या आंदोलनाला बुधवारपासून भामरागड, सिरोंचा, गडचिरोली, देसाईगंज या उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी तसेच वनरक्षक व वनपाल सुध्दा समर्थन दर्शविणार आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग