या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
- प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या विविध नियमांची सामाजिक जबाबदारी समजून अंमलबजावणी करण्याकडे केलेला कानाडोळा.
- सार्वजनिक कार्यक्रमातून होणारे एकत्रीकरण, लग्नासारखे कार्यक्रम पुढे ढकलण्याऐवजी नियम मोडून उत्साहाने पार पाडणे.
- ताप किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करून वेळीच कोरोना चाचणी करण्यासाठी केलेली टाळाटाळ. यामुळे योग्य उपचारास विलंब होऊन रुग्ण गंभीर झाले.
ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?
- लसीकरणाला गांभीर्याने न घेणे, त्याबाबत मनात शंका-कुशंका ठेवण्यामुळे लस उपलब्ध असतानाही ती घेण्यास टाळाटाळ करणे.
- गेल्यावर्षी ज्या पद्धतीने गावकरी स्वत:च संचारबंदीची कडक अंमलबजावणी करत बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश नाकारत होते. ती पद्धत यावर्षी दिसली नाही.
- कोरोनाचे नियम न पाळता सार्वजनिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणे, त्यातून संसर्ग पसरणे.
(फोटो कॅप्शन- गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी दिवसभर अशी रांग असते.)