शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अडीच वर्षे उलटूनही विकासाचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:44 IST

‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली.

ठळक मुद्देसूरजागडात कार्यकर्ता मेळावा : धर्मरावबाबा आत्राम यांची सरकारवर जोरदार टीका

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. भाजप सरकारच्या कार्यकाळाला आता अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र या अडीच वर्षात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात विकासाची ठोस कामे झाल्याचे दिसून येत नाही. जी कामे सुरू आहेत. ती जुन्या सरकारच्या कार्यकाळातील आहेत. विद्यमान सरकारच्या काळात आदिवासी बहुल भागात विकासाचा पत्ता नाही, अशी टीका माजी राज्यमंत्री तथा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील सूरजागड यात्रेनिमित्त सूरजागड येथे रविवारी कार्यकर्ता मेळावा तथा आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती बेबी लेकामी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, प्रभाकर बारापात्रे, फक्रुद्दीन अहमद, माजी सभापती मंगू मट्टामी, जि. प. सदस्य ज्ञानकुमार कौशी, ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते.याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी बांधवांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच सूरजागडातील ठाकूर देवाचे विधीवत पूजन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. किशोर बुरबुरे यांनी मानले.