शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अडीच वर्षे उलटूनही विकासाचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:44 IST

‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली.

ठळक मुद्देसूरजागडात कार्यकर्ता मेळावा : धर्मरावबाबा आत्राम यांची सरकारवर जोरदार टीका

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. भाजप सरकारच्या कार्यकाळाला आता अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र या अडीच वर्षात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात विकासाची ठोस कामे झाल्याचे दिसून येत नाही. जी कामे सुरू आहेत. ती जुन्या सरकारच्या कार्यकाळातील आहेत. विद्यमान सरकारच्या काळात आदिवासी बहुल भागात विकासाचा पत्ता नाही, अशी टीका माजी राज्यमंत्री तथा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील सूरजागड यात्रेनिमित्त सूरजागड येथे रविवारी कार्यकर्ता मेळावा तथा आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती बेबी लेकामी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, प्रभाकर बारापात्रे, फक्रुद्दीन अहमद, माजी सभापती मंगू मट्टामी, जि. प. सदस्य ज्ञानकुमार कौशी, ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते.याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी बांधवांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच सूरजागडातील ठाकूर देवाचे विधीवत पूजन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. किशोर बुरबुरे यांनी मानले.