शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

२ कोटीच्या कंत्राटानंतरही नाल्या तुंबलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत ...

ठळक मुद्देपावसाळापूर्व सफाई नाही : कंटेनर कचऱ्याने भरलेले, पाऊस पडताच वाढणार अस्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत वाढ होण्याची शक्यता आहे.शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेकडे १५ पुरूष आणि ९ महिला असे २४ स्थायी कर्मचारी आहेत. मात्र शहरातील संपूर्ण १२ प्रभागांमधील नाल्यांचा नियमित उपसा करून उपसलेला गाळ नगर परिषदेच्या खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात नेऊन टाकण्यासाठी नगर परिषदेने जानेवारी २०१८ मध्ये १ कोटी ४८ लाख ३१ हजार ४८७ रुपयांचा कंत्राट दिला. चंद्रपूरच्या श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने हा कंत्राट मिळविला. मात्र कंत्राटात दिलेल्या अटींची पूर्तता सदर संस्थेकडून होताना दिसत नाही.कंत्राटातील अटीनुसार दर १५ दिवसातून एकदा नाल्यांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी १०८ मजूर आणि काढलेला गाळ घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पोहोचविण्यासाठी दररोज ६ ट्रॅक्टर लावणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात एवढे मजूर कामावरच नसतात. परिणामी बहुतांश भागात एक ते दिड महिन्यापर्यंत नाल्यांचा उपसा होत नाही.नगर परिषदेसमोरच नाल्या तुंबलेल्याशहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या नगर परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या धानोरा मार्गावरील नाल्या दोन्ही बाजुने कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. त्यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या आवारात रस्त्याच्या कडेला महिला बचत गटाने झुनका भाकर केंद्र लागले आहे. अस्वच्छ नालीच्या शेजारी नागरिकांना झुनका भाकर खावे लागते.कंटेनर तुडूंब भरलेलेसर्व प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरून दररोज घंटागाड्या फिरवून घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने श्री गजानन बहुउद्देशिय बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला वार्षिक ५४ लाख ७३ हजार ८०३ रुपयांना कंत्राट दिला. दररोज ८१ मजुर त्यासाठी कार्यरत असणे अपेक्षित आहे. पण तेवढी मजूरसंख्या राहात नसल्यामुळे घंटागाड्या दररोज येतच नाही. याच कंत्राटदाराकडे कंटेनर भरल्यानंतर तो न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर नेऊन रिकामा करण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणचे कंटेनर कचºयांनी भरले असताना ते अनेक दिवसपर्यंत हलविले जात नाही. परिणामी तिथे दुर्गंधी सुटते. याशिवाय डासांचे प्रमाण वाढते.नाल्यांची सफाई होते, पण आधीच्या कार्यकाळात तयार झालेल्या नाल्यांचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे पाणी वाहून जात नाही. कंटेनर उचलण्यासाठी एकच पीकअप वाहन आहे. शहरातील मेलेले डुकर उचलण्यासाठीही त्याच वाहनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कंटेनर उचलून घन कचरा व्यवस्थापन केंद्रावर कचरा नेऊन टाकण्यासाठी कधी कधी उशीर होतो. न.प.कडे आणखी एक पीकअप वाहन असणे गरजेचे असून ते खरेदी करण्याचा विचार सुरू आहे.- अनिल कुनघाडकर,उपाध्यक्ष तथा सभापतीआरोग्य समिती, न.प. गडचिरोली