शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

२ कोटीच्या कंत्राटानंतरही नाल्या तुंबलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत ...

ठळक मुद्देपावसाळापूर्व सफाई नाही : कंटेनर कचऱ्याने भरलेले, पाऊस पडताच वाढणार अस्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत वाढ होण्याची शक्यता आहे.शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेकडे १५ पुरूष आणि ९ महिला असे २४ स्थायी कर्मचारी आहेत. मात्र शहरातील संपूर्ण १२ प्रभागांमधील नाल्यांचा नियमित उपसा करून उपसलेला गाळ नगर परिषदेच्या खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात नेऊन टाकण्यासाठी नगर परिषदेने जानेवारी २०१८ मध्ये १ कोटी ४८ लाख ३१ हजार ४८७ रुपयांचा कंत्राट दिला. चंद्रपूरच्या श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने हा कंत्राट मिळविला. मात्र कंत्राटात दिलेल्या अटींची पूर्तता सदर संस्थेकडून होताना दिसत नाही.कंत्राटातील अटीनुसार दर १५ दिवसातून एकदा नाल्यांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी १०८ मजूर आणि काढलेला गाळ घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पोहोचविण्यासाठी दररोज ६ ट्रॅक्टर लावणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात एवढे मजूर कामावरच नसतात. परिणामी बहुतांश भागात एक ते दिड महिन्यापर्यंत नाल्यांचा उपसा होत नाही.नगर परिषदेसमोरच नाल्या तुंबलेल्याशहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या नगर परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या धानोरा मार्गावरील नाल्या दोन्ही बाजुने कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. त्यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या आवारात रस्त्याच्या कडेला महिला बचत गटाने झुनका भाकर केंद्र लागले आहे. अस्वच्छ नालीच्या शेजारी नागरिकांना झुनका भाकर खावे लागते.कंटेनर तुडूंब भरलेलेसर्व प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरून दररोज घंटागाड्या फिरवून घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने श्री गजानन बहुउद्देशिय बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला वार्षिक ५४ लाख ७३ हजार ८०३ रुपयांना कंत्राट दिला. दररोज ८१ मजुर त्यासाठी कार्यरत असणे अपेक्षित आहे. पण तेवढी मजूरसंख्या राहात नसल्यामुळे घंटागाड्या दररोज येतच नाही. याच कंत्राटदाराकडे कंटेनर भरल्यानंतर तो न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर नेऊन रिकामा करण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणचे कंटेनर कचºयांनी भरले असताना ते अनेक दिवसपर्यंत हलविले जात नाही. परिणामी तिथे दुर्गंधी सुटते. याशिवाय डासांचे प्रमाण वाढते.नाल्यांची सफाई होते, पण आधीच्या कार्यकाळात तयार झालेल्या नाल्यांचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे पाणी वाहून जात नाही. कंटेनर उचलण्यासाठी एकच पीकअप वाहन आहे. शहरातील मेलेले डुकर उचलण्यासाठीही त्याच वाहनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कंटेनर उचलून घन कचरा व्यवस्थापन केंद्रावर कचरा नेऊन टाकण्यासाठी कधी कधी उशीर होतो. न.प.कडे आणखी एक पीकअप वाहन असणे गरजेचे असून ते खरेदी करण्याचा विचार सुरू आहे.- अनिल कुनघाडकर,उपाध्यक्ष तथा सभापतीआरोग्य समिती, न.प. गडचिरोली