शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

आसरअल्ली तालुक्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:58 IST

तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी,....

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थी संघाची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात आविसंच्या या शिष्टमंडळाने थेट सिरोंचाच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, संतोष भिमकरी, असरअल्ली तंमुसचे अध्यक्ष समय्या तोरकरी, रसुल शेख मेहबूब, विजय तुमडे, संजय चिंताकाणी, श्रीशैलम मोरला, लक्ष्मण सिडाम, समय्या गावडे, समय्या कोडापे, विजय भिमकरी, समय्या चौधरी, सुरेश पेटकरी, बिचमन्ना भडे, संतोष चेनुरी, शरद गुंडे, सुधाकर वायम, गणेश टेकाम, पुरूषोत्तम सुर्पा आदी उपस्थित होते.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आविसंने म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून असरअल्ली हे गाव २५० किमी अंतरावर आहे. सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेला पातागुडम हे गाव तालुक्यापासून ५५ किमी अंतरावर आहे. असरअल्ली महसूल मंडळ अंतर्गत १४ ग्रामपंचायती असून अनेक गावांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त डोंगराळ व जंगलव्याप्त हा भाग असल्याने सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.