शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोरचीत शेतकऱ्यांना अवजारांचे वाटप

By admin | Updated: June 14, 2014 23:35 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फ त कोरची येथील पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना दुबार

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फ त कोरची येथील पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना दुबार पीक व कृषी विभागाच्या अनेक योजनांविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, सुनंदा आतला, कोरची पंचायत समितीचे सभापती शालिनी आंदे, उपसभापती गोविंदराव दरवडे, व्ही. जे. महाजन, गजभिये, संवर्ग विकास अधिकारी भगत, बालविकास प्रकल्प अधिकारी सजनपवार, उपअभियंता दमाहे, तालुका कृ षी अधिकारी फुलझेले, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुमरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, राजेश नैताम, रामदास हारामी आदी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने जिल्ह्यातील शेतकरी शेती उत्पन्नात व इतर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत मागे पडलेला असल्याने शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मागणीतून विविध यंत्राचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध यंत्राचा वापर कशाप्रकारे करायचा याबाबत कृषी विभागामार्फ त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करावा, असे आवाहन अतुल गण्यारपवार यांनी केले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या मागणीवर विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी विभागाच्यावतीने मानव मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना भात रोवणी यंत्र, पॉवर ट्रीलर, भात कापणी यंत्र, कोनरिडर, युरीया ब्रिकेट अप्लीके टर, स्पे्रअर, डस्टर आदी यंत्राचा पुरवठा करण्यात येत आहे. कोरची तालुका हा निसर्गरम्य असून येथील बहुतांश जमीन सुपिक आहे. त्यामुळे शेतीतून अधिकाअधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दुबार पीक घेणे आवश्यक आहे. चना, मका, लाखोडी, मोहरी यासह अन्य पिकांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे अशा शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मोटार, इंजिनचा वापर करून बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नती करावी, आवश्यक असलेल्या यंत्राची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले.