शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिरोंचा शहराला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:08 IST

सिरोंचा शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. शासकीय जमीन गिळंकृत केली जात असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : शहराच्या सभोवतालची जमीन गिळंकृत

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. शासकीय जमीन गिळंकृत केली जात असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तालुका मुख्यालयाच्या बसस्थानकापासून तर संपूर्ण नगर पंचायतीचे क्षेत्र अवैध अतिक्रमण व बांधकामाने घेरले आहे. यातून स्मशानूभूमी, कब्रस्तान परिसरही सुटला नाही. अवैध अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुस्त बसून आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालीन मोगलाई अवतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा तोंडात मिठाची गुळणी घेऊन स्वस्त बसला आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या ६ आॅक्टोबर २००७ च्या आदेशाची अहवेलना झाली आहे. विभागीय आयुक्त यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र स्थानिक प्रशासनाचे अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्हाधिकाºयांनी ६ आॅक्टोबर २००७ रोजी काढलेल्या पत्रात अतिक्रमण हटविण्याबाबतचा आदेश पारित केला होता. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासकीय यंत्रणांना उद्देशून जिल्हाधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्याचे अधिकार पंचायत अधिनियम १९५८ नियम ५३ नुसार सरपंच यांना आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला असून त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तहसीलदार सिरोंचा यांनी अमलात आणावी, त्यानुसार तत्काळ कार्यवाही अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. तत्कालीन प्रभारी तहसीलदार दयाराम भोयर यांनी वरिष्ठांच्या आदेशाची दखल घेऊन कारवाई केली. त्यानंतर १६ जुलै २०१२ रोजी सिरोंचाचे अधिनस्त मंडळ अधिकारी व तलाठी यांना अतिक्रमण हटवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी कारवाई केली नाही.अतिक्रमित जागेत पक्के बांधकामसुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभारून सभोवताल काट्यांचे कुंपन करतात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून सिरोंचा शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे फुकटची जागा मिळत असल्याने बºयाच मोठ्या जागेवर कुंपन केले जात आहे.