शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावाच्या माेजणीमुळे अतिक्रमणधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे ...

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी तलावाची मोजणी करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी तलावाच्या मोजणीला सुरुवात झाली. एकेकाळी आलापल्लीची शान समजल्या जाणाऱ्या मामा तलावात कालांतराने माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. अनेक लोकांनी अतिक्रमण करून तलावाच्या पोटात घर बांधकाम सुरू केले आहे, तर राजकीय वरदहस्तप्राप्त काहींनी चक्क तलावाच्या पोटात शेतीजमीनसुद्धा काढली. गावातील अनेक जागरूक नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. दुर्लक्षामुळे तलावाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत गेले. गुरुवारी तलावाच्या जागेची माेजणी करताना अतिक्रमणधारकांचा विराेध हाेऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल तसेच भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाेलाविले हाेते. भूमी अभिलेख विभागाकडून उपअधीक्षक एन.जी. पठाण, भूकरमापक समय्या बोमानवार, विघेश मोरगू यांनी तलावाची मोजणी सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माेजणीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, संतोष अर्का, शंकर बोलूवार, भाग्यश्री बेझलवार, पुष्पा अलोणे, शारदा कडते, अनुसया सोप्पीडवार, सुगंधा मडावी, सुमन खोब्रागडे, बेबीताई आत्राम आदी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गड्डमवार, ग्रामसेविका संध्या गेडाम, तलाठी रवी मेश्राम, ज्येष्ठ नागरिक सुकरू कोरेत, संतोष तोडसाम, व्येंकटी सल्लम, पराग पांढरे, जुलेख शेख, दौलत कोरेत, किशोर सडमेक आदी उपस्थित होते.

६५ एकराचा तलाव बनला बाेडी

आलापल्ली येथील तलाव मूळ २६.३ हेक्टर म्हणजेच जवळपास ६५ एकरामध्ये विस्तारला आहे. या विशालकाय तलावाला आज बोडीचे रूप प्राप्त झाले आहे. सध्या जेमतेम २० एकर जागेत तलाव शिल्लक आहे. अतिक्रमण वाढत गेल्यास संपूर्ण तलाव गिळंकृत केला जाण्याची शक्यता आहे. हा धाेका ओळखून अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर तलावाचे खाेलीकरण, तसेच साैंदर्यीकरण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असा मानस सरपंच शंकर आत्राम यांनी ‘लाेकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला. तलावाचे खाेलीकरण झाल्यास जल साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल, अशी नागरिकांना आशा आहे.