शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

मामा तलावाच्या माेजणीमुळे अतिक्रमणधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे ...

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी तलावाची मोजणी करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी तलावाच्या मोजणीला सुरुवात झाली. एकेकाळी आलापल्लीची शान समजल्या जाणाऱ्या मामा तलावात कालांतराने माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. अनेक लोकांनी अतिक्रमण करून तलावाच्या पोटात घर बांधकाम सुरू केले आहे, तर राजकीय वरदहस्तप्राप्त काहींनी चक्क तलावाच्या पोटात शेतीजमीनसुद्धा काढली. गावातील अनेक जागरूक नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. दुर्लक्षामुळे तलावाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत गेले. गुरुवारी तलावाच्या जागेची माेजणी करताना अतिक्रमणधारकांचा विराेध हाेऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल तसेच भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाेलाविले हाेते. भूमी अभिलेख विभागाकडून उपअधीक्षक एन.जी. पठाण, भूकरमापक समय्या बोमानवार, विघेश मोरगू यांनी तलावाची मोजणी सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माेजणीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, संतोष अर्का, शंकर बोलूवार, भाग्यश्री बेझलवार, पुष्पा अलोणे, शारदा कडते, अनुसया सोप्पीडवार, सुगंधा मडावी, सुमन खोब्रागडे, बेबीताई आत्राम आदी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गड्डमवार, ग्रामसेविका संध्या गेडाम, तलाठी रवी मेश्राम, ज्येष्ठ नागरिक सुकरू कोरेत, संतोष तोडसाम, व्येंकटी सल्लम, पराग पांढरे, जुलेख शेख, दौलत कोरेत, किशोर सडमेक आदी उपस्थित होते.

६५ एकराचा तलाव बनला बाेडी

आलापल्ली येथील तलाव मूळ २६.३ हेक्टर म्हणजेच जवळपास ६५ एकरामध्ये विस्तारला आहे. या विशालकाय तलावाला आज बोडीचे रूप प्राप्त झाले आहे. सध्या जेमतेम २० एकर जागेत तलाव शिल्लक आहे. अतिक्रमण वाढत गेल्यास संपूर्ण तलाव गिळंकृत केला जाण्याची शक्यता आहे. हा धाेका ओळखून अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर तलावाचे खाेलीकरण, तसेच साैंदर्यीकरण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असा मानस सरपंच शंकर आत्राम यांनी ‘लाेकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला. तलावाचे खाेलीकरण झाल्यास जल साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल, अशी नागरिकांना आशा आहे.