शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

आंबा पिकातून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:55 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे आंबा महोत्सव २५ मे रोजी संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, फळबाग विभाग प्रमुख डॉ. एस. जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. एस. व्ही. घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी स्थानिक वाणाचा जिल्ह्यासह जिल्हाबाहेर प्रचार करावा, जेणेकरून आंब्याची मागणी वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. आंबा पीक तज्ज्ञ डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा विदर्भातील नंदनवन आहे. या ठिकाणी फळ पीकात भरपूर प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मुख्यत: आंबा, जांभूळ, फणस इत्यादींमध्ये आजच्या बदलत्या वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता याच पिकांमध्ये आहे. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता मदतीचा स्त्रोत होऊ शकतो. प्रत्येक फळझाडामध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग करून त्यांना अनैसर्गिकरित्या मानवाच्या उपयोगासाठी वापरल्या जाते. हे मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. यावर एकमेव उपाय म्हणून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या फळांचा आहारात वापर करावा.डॉ. ए. जी. भराड म्हणाले की, पूर्व विदर्भातील हवामान व जमिनीची पात्रता बघितली तर शेतकरी जर फळबागेकडे वळले तर नक्कीच यशस्वी होऊ शकतील, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रम समन्वयक संदीप कराडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात बेंगनपल्ली, रत्ना, दशेहरी, केसर, कलेक्टर, सीईओ आदी प्रकारचे वाण असल्याचे सांगितले. संचालन डॉ. अनिल तारू यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विषय विशेषज्ञ व अधिकाºयांनी सहकार्य केले.चांगले वाण उपलब्ध करासिरोंचा येथील शेतकरी विश्वेश्वरराव कोंड्रा यांनी कोकणामध्ये जसे अल्फासो या ब्रिटीश अधिकाºयाने हापूस आंब्याची रोपे वाटली. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आंब्याचे व इतर पिकांचे चांगले वाण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. प्रत्येक तालुकास्तरावर रोपवाटीका तयार केल्यास त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांना फळांची झाडे मिळतील, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :Mangoआंबा