शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकातून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:55 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे आंबा महोत्सव २५ मे रोजी संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, फळबाग विभाग प्रमुख डॉ. एस. जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. एस. व्ही. घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी स्थानिक वाणाचा जिल्ह्यासह जिल्हाबाहेर प्रचार करावा, जेणेकरून आंब्याची मागणी वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. आंबा पीक तज्ज्ञ डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा विदर्भातील नंदनवन आहे. या ठिकाणी फळ पीकात भरपूर प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मुख्यत: आंबा, जांभूळ, फणस इत्यादींमध्ये आजच्या बदलत्या वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता याच पिकांमध्ये आहे. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता मदतीचा स्त्रोत होऊ शकतो. प्रत्येक फळझाडामध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग करून त्यांना अनैसर्गिकरित्या मानवाच्या उपयोगासाठी वापरल्या जाते. हे मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. यावर एकमेव उपाय म्हणून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या फळांचा आहारात वापर करावा.डॉ. ए. जी. भराड म्हणाले की, पूर्व विदर्भातील हवामान व जमिनीची पात्रता बघितली तर शेतकरी जर फळबागेकडे वळले तर नक्कीच यशस्वी होऊ शकतील, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रम समन्वयक संदीप कराडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात बेंगनपल्ली, रत्ना, दशेहरी, केसर, कलेक्टर, सीईओ आदी प्रकारचे वाण असल्याचे सांगितले. संचालन डॉ. अनिल तारू यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विषय विशेषज्ञ व अधिकाºयांनी सहकार्य केले.चांगले वाण उपलब्ध करासिरोंचा येथील शेतकरी विश्वेश्वरराव कोंड्रा यांनी कोकणामध्ये जसे अल्फासो या ब्रिटीश अधिकाºयाने हापूस आंब्याची रोपे वाटली. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आंब्याचे व इतर पिकांचे चांगले वाण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. प्रत्येक तालुकास्तरावर रोपवाटीका तयार केल्यास त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांना फळांची झाडे मिळतील, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :Mangoआंबा