शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

आंबा पिकातून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:55 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे आंबा महोत्सव २५ मे रोजी संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, फळबाग विभाग प्रमुख डॉ. एस. जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. एस. व्ही. घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी स्थानिक वाणाचा जिल्ह्यासह जिल्हाबाहेर प्रचार करावा, जेणेकरून आंब्याची मागणी वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. आंबा पीक तज्ज्ञ डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा विदर्भातील नंदनवन आहे. या ठिकाणी फळ पीकात भरपूर प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मुख्यत: आंबा, जांभूळ, फणस इत्यादींमध्ये आजच्या बदलत्या वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता याच पिकांमध्ये आहे. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता मदतीचा स्त्रोत होऊ शकतो. प्रत्येक फळझाडामध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग करून त्यांना अनैसर्गिकरित्या मानवाच्या उपयोगासाठी वापरल्या जाते. हे मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. यावर एकमेव उपाय म्हणून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या फळांचा आहारात वापर करावा.डॉ. ए. जी. भराड म्हणाले की, पूर्व विदर्भातील हवामान व जमिनीची पात्रता बघितली तर शेतकरी जर फळबागेकडे वळले तर नक्कीच यशस्वी होऊ शकतील, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रम समन्वयक संदीप कराडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात बेंगनपल्ली, रत्ना, दशेहरी, केसर, कलेक्टर, सीईओ आदी प्रकारचे वाण असल्याचे सांगितले. संचालन डॉ. अनिल तारू यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विषय विशेषज्ञ व अधिकाºयांनी सहकार्य केले.चांगले वाण उपलब्ध करासिरोंचा येथील शेतकरी विश्वेश्वरराव कोंड्रा यांनी कोकणामध्ये जसे अल्फासो या ब्रिटीश अधिकाºयाने हापूस आंब्याची रोपे वाटली. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आंब्याचे व इतर पिकांचे चांगले वाण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. प्रत्येक तालुकास्तरावर रोपवाटीका तयार केल्यास त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांना फळांची झाडे मिळतील, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :Mangoआंबा